मुंबई – शिंदे गटाच्या “महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तणाव आणखी वाढण्यात जात आहे. अशात राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे. यावर आता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आपलं मत मांडत एकनाथ शिंदे यांचयामुळेच भाजप सत्तेत असल्याचे ते म्हणाले आहे.
दरम्यान, माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’एकनाथ शिंदे यांनी जर उठाव केला नसता तर भाजप सत्तेत आलेच नसते. त्यामुळे भाजपने शिंदेंचे महत्त्व जाणावे, असा खोचक सल्ला आमदार बच्चू कडू यांनी भाजपला दिला आहे.
बच्चू कडू पुढे म्हणाले,’एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह उठाव केला. त्यांच्या बलिदानामुळे भाजप आज सत्तेत आले आहे. याची जाणीव त्यांनी ठेवून शिंदेंचे महत्त्व लक्षात घ्यावे, नाहीतर पुढील पाच वर्षे जर उद्धव ठाकरे यांचे सरकार राहिले असते तर भाजपमधील १०५ आमदारांची संख्या पुढे ५० ते ६० वर आली असती. त्यामुळे शिंदेंसह त्यांच्या सहकाऱ्यांचे महत्त्व लक्षात घेणे गरजेचे आहे.’ असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करत म्हणाले होते,’मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा आदरच आहे. मात्र, त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत आहेत, असे वाटते. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना मुंबई म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र वाटायचा. तसेच, एकनाथ शिंदेंना आता ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र वाटत आहे. मात्र, ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही. त्यामुळे बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही. त्यामुळे एका जाहिरातीत दावा केला म्हणून आम्हाला काहीही फरक पडत नाही.’ त्यांच्या त्या टीकेवर आता शिंदे गटातील नेत्यांकडून प्रतिउत्तर येत आहे.