Babasaheb Ambedkar Jayanti: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५वा जयंती महोत्सव दिनानिमित्य दादरच्या चैत्यभूमीवर मध्यरात्रीपासूनच अनुयायांचा उत्साह ओसांडून वाहत आहे. चैत्यभूमी, दीक्षा भूमीवर अनुयायांची अलोट गर्दी झाली आहे. दादर येथील चैत्यभूमीवर राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक दृष्टीकोनाचा देखील उल्लेख केला. भारतात एक सेंट्रल बॅंक असली पाहिजे, असं बाबासाहेब यांनी सांगितलं होते. आपल्या चलनाच सिल्वर कोट संपवून गोल्डन कोट सुरु केलं पाहिजे, म्हणून रिझर्व्ह बॅंक स्थापन झाली. याची मुळ कल्पना ही बाबासाहेब यांची होती. १९२३ मध्ये त्यांनी मांडलेले आर्थिक तत्त्वज्ञान पुढे जगाने स्वीकारले आणि अनेक वर्षे तेच मॉडेल प्रभावी ठरले,” असं गौरवउद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. Babasaheb Ambedkar Jayanti “अमेरिकेसारख्या देशांनी डॉलर केंद्रित अर्थव्यवस्था स्वीकारून गोल्ड बॅकिंग कमी केले. मात्र सध्याच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत पुन्हा एकदा अमेरिका आणि चीनसारख्या देशांकडून सोन्याच्या साठ्याला महत्त्व दिले जात आहे. जगभरात सोन्याची खरेदी वाढत आहे, यावरून डॉ. आंबेडकरांचे विचार किती दूरदर्शी होते, हे स्पष्ट होते,” असेही फडणविसांनी जागतिक चलनव्यवस्थेतील बदलांवर भाष्य करताना सांगितले. संविधान हे आपल्या देशाचा पाया – एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितलं की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे निर्माते होते, तसेच ते माणुसकीचेही निर्माते होते. बाबासाहेबांनी त्यांचे ज्ञान स्वत:साठी न वापरता शोषित, वंचित, दीन दलितांच्या उद्धारासाठी वापरलंय. संविधान हे आपल्या देशाचा पाया आहे. आज एक सर्वसामान्य व्यक्ती देशाच्या उच्च स्थानी विराजमान होतो. Babasaheb Ambedkar Jayanti Babasaheb Ambedkar Jayanti: चैत्यभूमीवर भीमसागर…! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन आम्ही इथे बसलो ते संविधानाची शपथ घेऊन बसलो. आमच्या सुनेत्राताई उपमुख्यमंत्री होतात. ही संविधानाची देणं आहे. अदिवासी महिला राष्ट्रपती होतात, आणि मी शेतकरी कुटुंबातला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालो ते बाबासाहेब यांच्यामुळे. भिमाची लाडकी लेक ज्योती वाघमारे संसदेत पोहचली, बाबासाहेबांचा विचार हाच आमच्या सरकारचा डीएनए आहे, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. Babasaheb Ambedkar Jayanti हेही वाचा : Purushottam Kadalag : शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक! नेमकं प्रकरण काय?