लाखणगाव -अवसरी (ता. आंबेगाव) परिसरात काढणीला आलेल्या ऊन्हाळी बाजरीला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असून बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे धान्य व सरमाडाचे नुकसान झाले आहे.
पावसाळी बाजरीपेक्षा उन्हाळी बाजरीपासुन उत्पादन जास्त मिळत असल्याने शेतकरी उन्हाळी बाजरीचे पीक घेतात. त्याबरोबर बाजरीच्या सरमाडाचा उपयोग जनावरांना चारा म्हणूनही मोठ्या प्रमाणात होत असतो.
म्हणून शेतकरी उन्हाळी बाजरीला पसंती देत असतात. मागील पंधरा दिवसांपासून बाजरीची काढणी सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी बाजरी काढून ठेवली आहे.
तर काही शेतकऱ्यांची बाजरी पीक अजूनही शेतातच उभी आहे. त्यामुळे काढलेल्या बाजरीचे धान्य काळे पडणार आहे. तर सरमाड काळे पडल्याने जनावरे खाणार नाहीत.