Ashok Kharat Case : लिंगपिसाट भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात (Ashok Kharat Case) यांच्या महिलांच्या शोषणाच्या प्रकरणाने आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट आणि अजित पवार गट) आमनेसामने आले आहेत. शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना सहआरोपी (Ashok Kharat Case) करण्याची मागणी केली असता, अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विकास लवांडे यांचे आरोप शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सांगितले की, “राज्यभरात सध्या अशोक खरात यांचे प्रकरण गाजत आहे. या लिंगपिसाट अशोक खरात याने अनेक महिलांचे शोषण केले आहे, त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे.” ते पुढे म्हणाले, “रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि काल महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे. पण राजीनामा देऊन काही होणार नाही. यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची गरज आहे. त्याचबरोबर सुनील तटकरे यांनाही सहआरोपी करणे गरजेचे आहे. कारण रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे हे अशोक खरात यांच्या नेहमी संपर्कात होते आणि त्यांना भेटायला जायचे.” Ashok Kharat Case लवांडे पुढे म्हणाले सिन्नर तालुक्यातील हा अशोक खरात बाबा होता. स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे यांचा त्याला विरोध होता. खरात याने सुनील तटकरे यांना आग्रह धरला होता की माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळू नये. याचा खुलासा सुनील तटकरे आणि माणिकराव कोकाटे यांनी करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे या दोघांना सहआरोपी करावे, अशी मागणी लवांडे यांनी केली. आनंद परांजपे यांचे प्रत्युत्तर अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी विकास लवांडे यांना सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, “विकास लवांडे गांडूळासारखी आपली वळवळ बंद करा. माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अत्यंत विस्तृतपणे भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर कडक कारवाई महायुतीचे सरकार करतोय. गृहमंत्री म्हणून ते स्वतः लक्ष देऊन करतायत, त्याची संपूर्ण माहिती दिली.अशोक खरात याला मदत करणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीची चौकशी होईल आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका महायुती सरकारची आहे.” परांजपे पुढे म्हणाले, “चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काल दिलेला आहे. निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि भोंदू बाबा अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.” ते म्हणाले, “स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या बघायचं वाकून ही प्रवृत्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची राहिलेली आहे. प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना सहआरोपी करा असा आरोप केला. मला तर शंका येते की, त्यांचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या सांगण्यावरून त्यांनी हा आरोप केला नाही ना?” परांजपे यांनी जलसंपदा विभागाचा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, “जलसंपदा मंत्री असताना कोणाच्या आदेशाने ट्रस्टला पाणी दिले गेले? कोण जलसंपदा मंत्री होते? कोण मुख्यमंत्री होते? जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते. जयंत पाटील प्रांताध्यक्ष असताना अनेक त्यांचे फोटो आणि भेटी भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) यांच्याकडे झालेल्या आहेत. तर त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे.” परांजपे यांनी स्पष्ट केले की, महायुती सरकार निष्पक्ष चौकशी करणार असून दोषींवर कठोर कारवाई होईल.