मुंबई – मुंबईतील वरळी हा शिवसेनेचा गड मानला जातो. स्वतः युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून निवडणूक लढवली आणि ते जिंकून देखील आले. फुटीनंतर आगामी निवडणुकांमध्ये वरळीचा गड राखण हे शिवसेनेसाठी मोठं आव्हान असणार आहे. अशात भाजप नेते आशिष शेलार यांनी आमचं ठरलंय असं म्हणत वरळीवरून शिवसेनेवर निशाणा साधलाय.
शेलार यांनी दहीहंडीचा मुहूर्त साधक दोन सूचक ट्विट केली आहेत. ज्यात ते म्हणतात. “ज्या वरळीत सेनेच्या (?) खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी महापौर आणि नगरसेवक असे नेत्यांचे थरावर थर आहेत, तिथे म्हणे पक्षाला द्यायच्या 100 रूपयांच्या शपथपत्राला “बळ” अपुरे पडतेय…दुसरीकडे भाजपाची जांबोरी मैदानातील दहिहंडी मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादाने लक्षवेधी ठरतेय. ” अशा आशयाचे ट्विट शेलार यांनी केले आहे.
तर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात,”भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे…आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय. भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत…लवकरच..मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत ‘करुन दाखवतील’ आमचं ठरलंय !”
भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे…
आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय
भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत…
लवकरच..
मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत “करुन दाखवतील”
आमचं ठरलंय!!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 18, 2022
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी केलेले ट्विट सूचक आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधासभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदार क्षेत्रातून निवडून आले होते. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आदित्य ठाकरे यांच्यासमोर वरळी टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.