हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – राहुल गांधी यांची भारत जोडॊ यात्रा काल हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी हिंगोलीकरांच्यावतीने भव्य स्वागत देखिल करण्यात आले. स्वागतसाठी भले मोठे प्रवेश द्वार देखिल उभारण्यात आले होते मात्र स्वागतासाठी आपला जिगरी दोस्त नसल्याने राहुल गांधी भावुक झाले.
काँग्रेस नेते तथा माजी खासदार स्वर्गीय राजीव सातव यांच्या आठवणीत राहुल गांधी भाऊकी झाले आहेत.खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा काल दुपारी हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली. नांदेड-हिंगोली सीमेवर भव्य प्रवेशद्वार उभे करून पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. काही अंतरावर गेल्यानंतर खा.राहुल गांधी यांनी कॉर्नर सभेत मार्गदर्शन केले.
यावेळी हिंगोलीचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण करत राहुल गांधी भावूक झाल्याचे दिसून आले. जुने सहकारी राजीव सातव यांचे गांधी कुटुंबासोबत जिव्हाळ्याचे नाते होते.त्यांचा उल्लेख निघताच पदयात्रेतील अनेकांनी सातव यांची उणीव जाणवत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
सातव आणि गांधी कुटुंबात अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माजी मंत्री रजनी सातव यांनी १९८० ते ९० दरम्यान या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र राजीव २००९ मध्ये येथून आमदार झाले.दरम्यान, राजीव सातव हे युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदापासून राहुल गांधी यांच्या थेट संपर्कात आले.अल्पावधीतच त्यांनी राज्यभर कामाचा ठसा उमटवला.
राज्य युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदानंतर त्यांनी राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद देखील सांभाळले. त्यांनी हिंगोली लोकसभेची २०१४ ची निवडणूक लढवली.मोदी लाटेत देखील ते निवडून आले होते. यावेळी पूर्व नियोजित नसताना देखील राहुल गांधी यांनी हिंगोलीत सभा घेतली होती. त्यानंतर त्यांनी गुजरात विधानसभा प्रभारी म्हणून पक्षाला मोठे यश प्राप्त करून दिले. राजकीय क्षितिजावर प्रभावी कार्य सुरु असताना कोरोना काळात १६ मे २०२१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.सातव यांचे अकाली निधन गांधी परिवार आणि कॉंग्रेससाठी अनेकांना धक्का होता.
राहुल गांधी 2014 मध्ये राजीव सातव यांच्या प्रचारासाठी कळमनुरी येथे आले होते आज तब्बल आठ वर्षानी ते भारत जोडॊ यात्रा घेऊन आज सातवच्या घरी आले आहेत सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी भारत जोडॊ यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत देखिल केले
असे असणार आहे आजचे नियोजन
शेवला गाव ता कळमनुरी येथून सकाळी 6 वाजता यात्रेला सुरुवात होणार व अरती गाव मातोश्री हॉटेल जवळ कळमनुरी येथे सकाळी काही वेळ विश्रांतीनंतर पारडी मोड बस स्टँड कळमनुरी येथून दुपारी 4 वाजता पद यात्रेला सुरुवात होणार आहे. व संध्याकाळी 7 वाजता कळमनुरी येथील जि .प .हायस्कूल येथे काही वेळ विश्रांती व रात्रीचा मुक्काम कै .शंकरराव सातव महाविद्यालय मैदान येथे असणार आहे.