मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचा मास्टर प्लॅन काय आहे? जाणून घ्या सर्व काही..

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. येत्या काही महिन्यांत दिल्ली विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीचे (आप) कार्यकर्ते आणि जनतेपर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दिल्लीतील जनतेचा विश्वास जिंकण्याचा ते प्रयत्न करतील. दरम्यान, केजरीवाल यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दीर्घकाळ अटक करण्यात आल्याने आप कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचल्याची स्थिती आहे.
केजरीवाल हरियाणा निवडणूक प्रचारात उडी घेणार –
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार करणार आहेत, 5 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पक्षाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की ते अशा ठिकाणी रोड शो देखील करू शकतात जिथे पक्षाला चांगले काम करण्याची अपेक्षा आहे.
केजरीवाल दिल्लीतील प्रत्येक प्रभागाला भेट देणार –
पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांनी दिल्लीतील प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांना भेटण्याची योजना आखली आहे. दिल्लीत फेब्रुवारी २०२५ मध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. त्याआधी पक्षाकडे चार महिने हे रणनीती बनवण्यासाठी आणि ‘आप’च्या मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आहे.
कार्यकर्त्यांना बळ देणार –
पक्षाच्या नेत्याने सांगितले की नोकरशहा-राजकारणी बनलेले केजरीवाल हे त्यांच्या तळागाळातील राजकारण आणि सक्रियतेद्वारे लोकांवर प्रभाव टाकण्याच्या त्यांच्या सवयीसाठी ओळखले जातात. त्यांना अटक होऊनही विरोधकांच्या अपेक्षेप्रमाणे पक्ष फुटला नाही. पक्षातील ज्येष्ठ नेतेच नव्हे तर तळागाळातील कार्यकर्त्यांनाही सर्व काही ठीक होईल, असा ठाम विश्वास होता. पक्षाचे नेते पुढे म्हणाले की, आता केजरीवाल बाहेर आहेत. त्यांनी फक्त या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना बळ देण्याची गरज आहे. त्यांच्याकडून अजूनही खूप अपेक्षा आहेत.
पंजाबमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार –
पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, विश्वास संपादन करण्यासाठी केजरीवाल पंजाबला जाऊन तेथील अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. हरियाणामध्ये त्यांचे रोड शो आणि रॅली आयोजित करण्याची पक्षाची योजना आहे. ते झारखंड आणि महाराष्ट्रातही जाऊ शकतात. केजरीवाल जम्मू-काश्मीरमध्येही प्रचार करू शकतात, असे आपच्या सूत्रांनी सांगितले. जिथे पक्षाकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे त्या-त्या सर्व ठिकाणी केजरीवाल दौरा आणि रोड शो करणआर आहेत.
केजरीवाल जनतेची लिटमस टेस्ट देतील –
रविवारी राजीनामा जाहीर करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘जेव्हा लोक मला प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देतील तेव्हाच मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मला लिटमस टेस्ट द्यायची आहे. ते म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री होणार आणि मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री तेव्हाच होणार जेव्हा लोक म्हणतील की आम्ही प्रामाणिक आहोत.’





