“मला तुमची सुरक्षा नको.. मला जनतेत…” ताफा अडवणाऱ्या पोलिसांसोबत अरविंद केजरीवाल यांची हुज्जत

Updated On:

 

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नेहमी शांत आणि सय्यमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. केजरीवाल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पोलिसांसोबत त्यांनी हुज्जत झाल्याचे पाहायला मिळाले. अहमदाबादच्या दौऱ्यावर असताना केजरीवाल यांनी रिक्षातून प्रवास केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवल्याने वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

अहमदाबादमध्ये जाण्यासाठी केजरीवाल यांनी थेट रिक्षा पकडली आणि ते प्रवास करू लागले. मात्र पोलिसांनी त्यांचा ताफा मधेच थांबवत पुढे जाण्यासाठी मज्जाव केला. त्यावेळी तुमचे नेता जनतेत जात नाहीत म्हणून गुजरातची जनता दुखी आहे आम्ही जनतेत जात आहोत आम्हाला अडवणे हा तुमचा प्रोटोकॉल आहे का ? असा सवाल संतापलेल्या केजरीवाल यांनी पोलिसांना केला.

काय म्हणाले केजरीवाल नेमकं यावेळी
तुमच्या नेत्यामुळे जनता दुखी आहे. आम्हाला तुमची सिक्युरिटी नको तुम्ही तुमची सुरक्षा घेऊन जा, मला जनतेत जायचे आहे तुम्ही तुमची सिक्युरिटी तुमच्या मुख्यमंत्र्यांना द्या. मी तुम्हाला चिट्ठी लिहून दिली आहे मला तुमची सुरक्षा नको आहे तरी तुम्ही मला कैद कर्णयसाठी सुरक्षा देत आहेत असे खडे बोल केजरीवाल यांनी पोलीस अधिकाऱ्याला सुनावले.

आणखी संबंधित बातम्या

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्‍या अडचणीत वाढ; 'त्या' प्रकरणात याचिका दाखल

2026-05-14 22:38:51

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्‍या अडचणीत वाढ; 'त्या' प्रकरणात याचिका दाखल

Indian Bank RAM Loan Camp: इंडियन बँकेतर्फे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यासाठी 'मेगा रॅम' कर्ज शिबीर

2026-05-08 22:35:28

Indian Bank RAM Loan Camp: इंडियन बँकेतर्फे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यासाठी 'मेगा रॅम' कर्ज शिबीर

Arvind Kejriwal : "पंजाब विधानसभा निवडणूक ही मोदींची शेवटची निवडणूक ठरेल..."; अरविंद केजरीवाल यांचे थेट आव्हान

2026-05-05 19:07:39

Arvind Kejriwal : "पंजाब विधानसभा निवडणूक ही मोदींची शेवटची निवडणूक ठरेल..."; अरविंद केजरीवाल यांचे थेट आव्हान

अग्रलेख : व्यक्ती आणि शक्ती

2026-05-01 06:00:25

अग्रलेख : व्यक्ती आणि शक्ती

MANISH SISODIA: "दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही" ; केजरीवाल यांच्यानंतर मनीष सिसोदिया यांचाही मोठा निर्णय

2026-04-28 11:30:57

MANISH SISODIA: "दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही" ; केजरीवाल यांच्यानंतर मनीष सिसोदिया यांचाही मोठा निर्णय