मुंबई – अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लीक टीव्हीच्या स्टुडिओच्या इंटिरिअर उभारणीचे काम माझ्या पतीने केले. त्यांचा तो शेवटचा प्रोजक्ट होता. या कामासाठी आम्ही पाचशे माणसे दिवसरात्र राबवली. पण नंतर अर्णव गोस्वामीने माझ्या पतीचे 83 लाख रुपये थकवले. हे पैसे त्यांनी वेळेत दिले असते तर आज माझे पती जिवंत असले असते.
अर्णव गोस्वामीच माझ्या पतीच्या व माझ्या सासूबाईंच्या मृत्यूला जबाबदार आहेत. आज त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली त्यासाठी मी पोलिसांचे आभार मानते, अशा शब्दांत आत्महत्या केलेल्या आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी आज आपली व्यथा व्यक्त केली आहे.
“अर्णब गोस्वामींच्या अटकेमुळे काही नावं बाहेर पडतील अशी भाजपला भीती”
अर्णव गोस्वामी यांना आज सकाळी अटक केल्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या की, अणर्व यांनी आमचे पैसे थकवल्यानंतर आम्ही त्यांना भेटण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण ते आम्हाला भेटले नाहीत. एवढेच नव्हे तर त्यांनी आमच्याकडून काम करून घेणाऱ्या अन्यही दोघांना आमच्या विरोधात भडकावले आणि त्यांनीही आमचे पैसे थकवले.
अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर अमृता फडणवीस म्हणाल्या…
या प्रकरणानंतर अन्वय आणि त्यांच्या मातोश्रींनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी आमच्या आत्महत्येला अर्णव गोस्वामी जबाबदार असल्याचे स्पष्ट लिहून ठेवले आहे.
याप्रकरणी अलिबाग पोलिसांत गुन्हा नोंदवला. आम्हाला गुन्हा नोंदवण्यासही परावृत्त करण्यात आले. पण आम्ही आग्रह कायम ठेवल्यानंतर केवळ कागदोपत्री गुन्हा दाखल केला पण अर्णव यांच्यावर काहीही कारवाई केली नाही. त्यांनी तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधातही यावेळी गंभीर आरोप केले.
भाजपचे माजी खासदार संजय काकडे पत्नीसह गायब
काय म्हटले आहे अन्वय नाईक यांच्या मृत्युपूर्व चिठ्ठीत ?
अर्णव गोस्वामी यांनी 83 लाख रुपये थकवल्याने आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ही चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात आली असून त्या चिठ्ठीत या साऱ्या प्रकरणाचा तपशिलाने नोंद करण्यात आली आहे.
“ती खेळी शरद पवारांचीच; सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी बेस तयार केला जातोय”
त्यात चिठ्ठीत अन्वय नाईक यांनी म्हटले आहे की आम्ही खालील कारणामुळे आत्महत्या करीत आहोत. मी अन्वय नाईक आणि माझ्या मातोश्री कुमुद नाईक आम्ही दोघेही आमच्या कंपनीचे संचालक आहोत. खाली नाव नमूद केलेल्या व्यक्तींनी आमचे पैसे बुडवले आहेत.
1. अर्णव गोस्वामी, हे रिपब्लीक टीव्हीचे प्रमुख असून त्यांनी आमचे 83 लाख रुपये थकवले आहेत. त्यांच्या बॉम्बे डाईंग स्टुडिओचे काम आम्ही केले आहे.
2. स्की मीडियाचे फिरोज शेख. त्यांच्या अंधेरीतील आयडिया स्क्वेअर प्रकल्पातील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचे काम आम्ही केले त्याचे चारशे लाख रुपये त्यांच्याकडून येणे आहे.
3. स्मार्ट वर्क कंपनीचे मालक नितेश सारडा यांच्याकडेही आमचे 55 लाख रुपये पेंडिंग आहेत. या तिघांकडून हे पैसे वसूल करा आणि त्यांनाच आमच्या मृत्यूबद्दल जबाबदार धरा, असे अन्वय नाईक यांनी आपल्या मृत्युपूर्व नोंदीत स्पष्टपणे नमूद केले आहे.