मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी रॅपिड टेस्टची मान्यता मिळाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या टेस्टमुळे कोरोनाची लागण आहे किंवा नाही ते प्राथमिक चाचणीतच कळणार आहे.
तसेच रक्ताचे नमुने घेतल्यानंतर ५ मिनिटामध्ये कोरोनाची लागण समजणार आहे. या टेस्टमुळे लगेच नागरिकांना कोरोनाची बाधा असेल तर विलीगीकरण कक्षात तात्काळ दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात तरी कोरोनाला रोखता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी राजेश टोपे यांनी हि माहिती दिली. तसेच राज्यात कायद्याची कडक अमलबजावणी करण्यात येत आहे. सोशल डिस्टिंगमध्ये कोणतीही ताजोडर करार नाही असे ते म्हणाले.