पाणीसाठा ८१ टीएमसी; सावधानतेचा इशारा
कोयनानगर : धरणातून नदीपात्रात ३२,१०० कुसेक पाण्याचा विसर्ग होत असला तरी वाढत असणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यामुळे धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गात १० हजाराने वाढ करण्यात येणार असल्याचे कोयना प्रशासनाने स्पष्ट केले आहॆ.
त्यानुसार आज दि. २६ रोजी दुपारी १२ वाजता धरणातून ४२१०० कुसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहॆ .धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येणार असल्याने नदीकाठील गावांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहॆ.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत मुसळधार पडलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 78 हजार कुसेक झाली आहॆ. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहॆ. धरणाचा पाणीसाठा 81 टीएमसी झाला आहॆ. धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून 32 हजार कुसेक पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी धरणाच्या जलपातळीत वाढ होत असल्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात बारा वाजता वाढ करण्यात येणार आहॆ. धरणातून नदीपात्रात 30 हजारांवरून 40 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहॆ.
गत २४ तासात पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 198 मिमी नवजा येथे 172 मिमी तर महाबळेश्वर येथे २६७ मिमी पावसाची नोंद झाली आहॆ. पाणलोट क्षेत्रात सर्वदूर मुसळधार पाऊस होत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ७८४८७ कुसेस्क आहॆ.यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढच होत आहॆ.