सोमेश्वरनगर – सत्ताधारी पक्ष पैशांची आणि विविध चौकशीची भीती दाखवत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी झाल्यापासून तेही बोलायचे कमी झाले आहेत, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे.
कोहिनूर मिलप्रकरणी राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी ईडीकडून चौकशी करण्यात आली. सरकारविरोधात भूमिका घेतल्यानेच राज ठाकरेंमागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. पण सरकारने कितीही चौकशा लावल्या तरीही माझा आवाज बंद होणार नाही, असे राज ठाकरे यांनी नमूद केले होते; मात्र आता राज ठाकरे चौकशीनंतर बोलायचे कमी झाले आहेत, असे अजित पवार यांनी सांगून खळबळ उडवून दिली आहे.