नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांपासून अनन्या पांडे आणि ईशान खट्टर त्यांच्या नात्याबद्दल चर्चेत आहेत. अनेकदा ते पार्टी आणि हॉलिडे डेस्टिनेशन्सवर एकत्र दिसले. मात्र, आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे. 3 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अनन्या पांडे आणि ईशान खट्टरचा ब्रेकअप झाला आहे.
पिंक व्हिलाच्या रिपोर्टनुसार, 3 वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेर त्यांनी आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यातील नाते निरोगी आहे आणि त्यांचे नाते एका चांगल्या वळणावर संपले.
त्यांच्या जवळच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार, दोघांमधील नातं संपलं आहे. मात्र, एखादा प्रोजेक्ट आला तर दोघेही एकत्र काम करतील. समजूतदारपणे ब्रेकअप करून ते पुढे जात आहेत. त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध चांगले आहेत. त्यांच्या लक्षात आले की त्यांची एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची पद्धत एकमेकांपेक्षा थोडी वेगळी आहे आणि दोघेही एकमेकांसाठी बनलेले नाहीत. खास गोष्ट म्हणजे एका महिन्यापूर्वी, इशान खट्टर आणि अनन्या पांडे शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र दिसले होते आणि दोघेही एकमेकांसोबत खूपच कम्फर्टेबल होते.
दरम्यान, अनन्या अलीकडेच सिद्धांत, दीपिका पदुकोण आणि धैर्य करवासोबत गहराईयांमध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. पुढे ती लिगारमध्ये विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. हा चित्रपट ऑगस्ट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.