नवी दिल्ली – फणी चक्रीवादळानंतर आता आसामला शनिवारी संध्याकाळी 4.33 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी नोंदवण्यात आली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू भारत-म्यानमार सीमा क्षेत्राच्या (नागालँड) आसपास होता. भूंकपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे कोणतेही वृत्त आलेले नाही.
IMD-Earthquake: An earthquake with a magnitude of 5.4 on the Richter Scale hit Myanmar-India (Nagaland) Border Region, today at 4:33 PM.
— ANI (@ANI) May 4, 2019