Amit Shah on West Bengal। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या पश्चिम बांगलाच्या दौऱ्यावर आहेत , यावेळी त्यांनी कोलकाता याठिकाणी पत्रकार परिषद घेत त्याठिकाणच्या राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यांनी “गेल्या पाच वर्षांत बंगाल भय, भ्रष्टाचार आणि घुसखोरीने ग्रासले आहे.” असे म्हटले. तसेच शाह यांनी दावा केला की,”जर २०२६ मध्ये भाजपचे सरकार आले तर ते घुसखोरांना शोधून शोधून बाहेर काढतील आणि विकासाला गती देतील.” यावेळी त्यांनी ,”हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. त्यांनी १९४३ मध्ये याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये भारतीय तिरंगा फडकवला होता याची आठवण करून दिली. अमित शहा यांनी या पत्रकार परिषदेमध्ये पश्चिम बंगालमध्ये एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. असं सांगत गेल्या १५ वर्षांतील तृणमूल काँग्रेसच्या राजवटीवर टीका केली. टीका करताना त्यांनी, या काळात बंगालमध्ये भीती, भ्रष्टाचार आणि कुशासनाचे राज्य राहिले आहे, ज्यामुळे लोक भीती आणि दहशतीत आहेत”असा दावा केला. अमित शाह यांनी सांगितल्या ‘या’ गोष्टी Amit Shah on West Bengal। पुढे बोलताना त्यांनी, आतापासून एप्रिलपर्यंतचा काळ बंगालसाठी महत्त्वाचा आहे आणि जनता भय आणि कुशासनमुक्त सरकार स्थापन करण्यास तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले तर येथे विकासाची लाट सुरू होईल, असे आश्वासनही अमित शहा यांनी दिले. बंगालमध्ये घुसखोरी रोखण्यासाठी विशेष ग्रिड तयार केले जातील आणि घुसखोरांना निवडकपणे बाहेर काढले जाईल, “असे अमित शहा यांनी सांगितले. अमित शहा यांनी यावेळी, “१५ एप्रिल २०२६ रोजी भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पुनर्जागरण सुरू होईल. बंगाल भाजपसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल” असा मोठा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे. निवडणुकीतील विजय अन् मजबूत पायाचा उल्लेख Amit Shah on West Bengal। अमित शहा यांनी भाजपच्या मागील निवडणूक निकालांचाही उल्लेख केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना १७ टक्के मते आणि दोन जागा मिळाल्या, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना १० टक्के मते आणि तीन जागा मिळाल्या आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुख्य विरोधी पक्षाचे स्थान मिळवले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३९ टक्के मते आणि १२ जागा मिळाल्या.