नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वानी एकत्र यावे, असे अवाहन केले आहे. त्यांनी एक ट्विट करीत लिहले आहे कि, सर्वानी जात, धर्म विसरून एकत्र यावे. कोरोनाचे संकट सर्वांसाठी एकी दाखवण्याचे संकट आहे.
कोरोनाला हरवण्यासाठी आत्मबलिदान, सहानुभूती, करुणा, असणे आवश्यक आहे. कोरोनाला हरवाचे असेल तर सर्वानी सोबत येऊन कोरोनाविरुद्धची लढाई लढता येईल. तसेच सर्वानी कायद्याचे पालन करावे, सोशल डिस्टन्स पाळावा असे अवाहन देखील त्यांनी केले.