Akhilesh Yadav : उत्तरप्रदेशात आणखी एक एसआयआर शक्य; अखिलेश यादव यांनी व्यक्त केले मत
उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीआधी आणखी एकदा मतदारयाद्यांची पडताळणी (एसआयआर) केली जाऊ शकते. नव्या मतदारयाद्या बनवण्यासाठी तसे होऊ शकेल, असे भाष्य समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी केले.

Akhilesh Yadav : उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीआधी आणखी एकदा मतदारयाद्यांची पडताळणी (एसआयआर) केली जाऊ शकते. नव्या मतदारयाद्या बनवण्यासाठी तसे होऊ शकेल, असे भाष्य समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी केले.
उत्तरप्रदेशात वेळापत्रकानुसार पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत विधानसभा निवडणूक होईल. त्या राज्यात निवडणूक आयोगाने याआधीच एसआयआर मोहीम राबवली. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्यांदा ती मोहीम राबवली जाऊ शकते. त्यामुळे जनतेने सतर्क राहावे, असे आवाहन अखिलेश (Akhilesh Yadav) यांनी पत्रकार परिषदेत केले. भाजपशी राजकीय संघर्ष करणाऱ्या विरोधी पक्षांकडून सातत्याने एसआयआरवर आक्षेप घेतला जातो.
भाजपच्या राजकीय लाभासाठी अस्सल मतदारांनाही याद्यांमधून वगळले जाते, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. एसआयआरवर आक्षेप घेणाऱ्या पक्षांमध्ये सपचाही समावेश आहे. अखिलेश यांनी वारंवार त्यासंदर्भात भूमिका मांडली. आता त्यांनी पुन्हा एसआयआरचा मुद्दा उपस्थित केला.
त्यांनी महागाई, कायदा-सुव्यवस्था स्थिती आणि इतर मुद्द्यांवरूनही भाजप तसेच उत्तरप्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवली. भाजपची सत्ता असणारे उत्तरप्रदेश हे राज्य राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. त्यामुळे निवडणूक जवळ येऊन लागल्याने त्या राज्यातील राजकारण (Akhilesh Yadav) तापू लागले आहे.






