नवी दिल्ली: केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारताला कात्रीत पकडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी पाकने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले. एवढ्यावरच न थांबता पाकने हवाई मार्गदेखील बंद केला आहे. तर, आता पाकिस्तनाने समझौता एक्सप्रेस थांबविली आहे. मात्र, समझौता एक्सप्रेसबद्दल किती दिवसांसाठी बंद, हे निश्चितपणे सांगण्यात आलं नाही.
दरम्यान राजनाथ सिंह, यांनी पाकिस्तानला टोला लगावला आहे. सर्वात मोठी भीती आपल्याला शेजाऱ्यांकडून असते. अडचण अशी आहे की आपण मित्र बदलू शकता, परंतु शेजारी निवड आपल्या हातात नाही. जसा शेजारी आपल्या शेजारी बसला आहे, देव करो असा शेजारी कोणालाही न मिळो…
Defence Min Rajnath Singh:Sabse badi ashanka toh hume hamare padosi ke bare mein rehti hai.Samasya yeh hai aap dost badal sakte hain magar padosi ka chunav aapke haath mein nahi hota hai. Aur jaisa padosi hamare bagal mein baitha hai,paramatma kare ki aise padosi kisi ko na mile. pic.twitter.com/22PQ9aeIec
— ANI (@ANI) August 8, 2019