Ajit Pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधानानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांनी आपले प्राण गमावले. या अपघातानंतर दररोज नवीन माहिती समोर येत आहे. विमान अपघाताविषयी शंका देखील उपस्थित केली जात आहे. मात्र, अजित पवार यांनी विमान अपघात घडण्यापूर्वी फोनद्वारे शेवटचा संवाद कोणासोबत साधला होता आणि ते संवादात नेमकं काय म्हणाले होते याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी विमानातून शेवटचा फोन त्यांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांना केला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजितदादा पवार यांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद सर्वांना ऐकवण्यात आला. जी अॅाडिओ क्लिप सर्वांना ऐकवण्यात आली. त्यामध्ये अजित पवार नेमकं काय म्हणाले होते हे पाहूयात अजित पवार यांनी शेवटचा कॅाल विमानातून त्यांच्या चुलत पुतण्याला केला होता. श्रीजीत पवार यांनी सांगितले की, जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने माळी समाजातील उमेदवार दिला नव्हता. त्यावर आपण त्या समाजातील उमेदवार देऊयात अशी विनंती केली होती. त्यावर अजित पवार यांनी आपण सगळ्याच जाती-धर्माच्या माणसांना सोबत घेऊन जायची असल्याची भूमिका मांडली. पुढे श्रीजीत पवार यांनी सांगितले की, आपण अजितदादांना एक मेसेज केला होता. त्यानंतर अजित पवारांनी मेसेज पाहून विमानातून कॉल केला. ते म्हणाले तुम्हाला काही माहिती नसतं… काही नसतं.. बाळा, आपण सगळ्या जातीधर्माला सोबत घेऊन जातो. सुप्यात माळी समाजाला आपण उमेदवारी दिली. इतर ठिकाणीदेखील ओबीसी उमेदवारांना पण संधी दिली. इतर पक्षांनी उमेदवारी दिली नाही, असे अजित पवार म्हणाले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या अॅाडिओ क्लिपवरून स्पष्ट होते की, अजित पवार पक्षामध्ये कार्यकर्ते आणि पक्षाच्या कामाला किती महत्व देते होते. अजित पवार यांच्या निधानानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे अर्थ खाते वगळता इतर तीन महत्वाची खाते देण्यात आली असून, आता त्यांना पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. हेही वाचा : Urmila Matondkar Birthday: करिअरच्या शिखरावर असतानाच उर्मिला मातोंडकर यांनी घेतला सिनेसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय