Best Recharge Plans: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) टेलिकॉम कंपन्यांना केवळ वॉइस आणि एसएमएस सुविधेसह येणारे रिचार्ज प्लॅन्स सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता जिओ, एअरटेल आणि व्हीआयने ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्स लाँच केले आहेत. कंपनीने 84 दिवसांच्या मुदतीसह येणारे शानदारप्लॅन्स लाँच केले आहेत. जिओ, एअरटेल आणि व्हीआयपैकी कोणत्या कंपनीचा प्लॅन चांगला आहे, त्याविषयी जाणून घेऊयात. Airtel चा 84 दिवसांचा प्लॅन एअरटेलच्या 84 दिवसांच्या मुदतीसह येणाऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 469 रुपये आहे. या रिचार्जमध्ये ग्राहकांना 84 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एकूण 900 एसएमएसची सुविधा मिळेल. या प्लॅनमध्ये यूजर्सला दिवसाला फक्त 5.58 रुपये खर्च करावे लागतील. Jio चा 84 दिवसांचा प्लॅन जिओने देखील 84 दिवसांच्या मुदतीसह येणारा प्लॅन लाँच केला आहे. कंपनीच्या 84 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनची किंमत 448 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एकूण 1000 मोफत एसएमएस दिले जातात. याशिवाय, JioTV, JioCinema आणि JioCloud सारख्या जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. Vodafone Idea चा 84 दिवसांचा प्लॅन व्हीआयच्या 84 दिवसांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना देशभरात सर्व नेटवर्क अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एकूण 900 मोफत एसएमएस मिळतात. या प्लॅनची किंमत 470 रुपये आहे. अशाप्रकारे या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना दिवसाला 5.5 रुपये खर्च येईल. कोणत्या कंपनीचा प्लॅन सर्वोत्तम? Airtel, Jio आणि Vi या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांकडून 84 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स लाँच करण्यात आले आहेत. तिन्ही कंपन्यांमध्ये जिओच्या प्लॅन्सची किंमत सर्वात कमी आहे. तर एअरटेल आणि व्हीआयच्या प्लॅन्सची किंमत जवळपास समान आहे. एअरटेल आणि व्हीआयच्या प्लॅन्समध्ये कालावधीसाठी समान 900 मोफत एसएमएस दिले जातात. जर जिओच्या प्लॅन्समध्ये 84 दिवसांसाठी 1000 मोफत एसएमएस मिळतील.