नवी दिल्ली -जागतिक स्पर्धा येत्या ऑगस्ट महिन्यात होत आहे. या स्पर्धेत 90 मीटरचे जादूई अंतर पार करण्याचे किंवा गाठण्याचे लक्ष्य असून त्या स्पर्धेत देशाला सुवर्णपदकही मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे, असे मत भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने व्यक्त केले आहे.ही जागतिक स्पर्धा पुढील वर्षी पॅरिसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारीचा भाग म्हणून अत्यंत महत्वाची आहे. स्पर्धेत सहभागी होत असताना वैयक्तीक तंदुरुस्तीवरही मी भर देत आहे.
सराव तर सातत्याने होतच आहे परंतु आहार व व्यायाम यांचेही नियोजन व्यवस्थीतरीत्या होत आहे. यंदाच्या मौसमाला येत्या 5 मेपासून प्रारंभ होत आहे. नव्या मौसमाची सुरुवात यशस्वी करण्यासाठीच सध्या कसून मेहनत घेत आहे. मौसमाच्या प्रारंभी डायमंड लीग स्पर्धा होत आहे व ही स्पर्धा जागितक स्पर्धेची रंगीत तालिम समजली जाते, त्यामुळे सध्या एकेका स्पधवर लक्ष केंद्रित करणार आहे, असेही निरज म्हणाला.
पदकाचा रंग बदलणार का?
जपानमध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकनंतर गेल्या वर्षी पार पडलेल्या जागतिक स्पर्धेत रजतपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या मोसमात तात्र पदकाचा रंग बदलण्यासाटी तो सज्ज होत आहे. यंदाच्या मोसमात ऑक्टोबरमधील आशियाई क्रीडा स्पर्धा, त्यानंतर जागतिक स्पर्धा होणार आहेत. यावेळी जागतिक स्पर्धा हंगेरीत होणार आहेत. नीरज सध्या अंताल्या येथील ग्लोरिया स्पोर्टस एरिनामध्ये सराव करत आहे. नीरज गेल्या वर्षी डायमंड लीगमध्ये सहभागी झाला नव्हता.