मंच र– महाराष्ट्रातील सुमारे 70 हजार कृषी सेवा केंद्र ऐन रब्बी हंगामात गुरुवार (दि. 2) ते शनिवार (दि. 4 नोव्हेंबर) असा 3 दिवसांचा बंद पाळून राज्य शासनाच्या जाचक कायद्याचा निषेध नोंदवणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा ऍग्रो डिलर्सचे अध्यक्ष महेश मोरे यांनी दिली.
शासनाच्या नवीन प्रस्तावित कषी कायदा विधेयक क्र 40.41,42,43 व 44 मधील कृषी हिताल बाधा आणणाऱ्या जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित कायदे रद्द करण्यासाठी महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोशिएशन (माफदा) यांनी वेळोवेळी कृषी सचिव, कृषी आयुक्त तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनाही निवेदन व मिटींग घेऊन या अन्यायकारक कायद्यातील जाचक नियमांमुळे होणारे संभाव्य नुकसान व धोके व संपूर्ण व्यापारावर होणारे विपरीत परिणाम व त्यातुनच एकंदरीत शेतकरी बांधवांचे होणारे नुकसान याविषयी माहिती दिली.