नवी दिल्ली – पुलवामाच्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारताने बालाकोट येथील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने F-16 विमानांचा वापर करत भारतीय हद्दीत घुसण्याचा असफल प्रयत्न केला होता. या प्रयत्नात पाकिस्तानला आपले एक F-16 विमान देखील गमवावे लागले होते. मात्र त्यानंतर काल रात्री पुन्हा पाकिस्तानच्या F-16 विमानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
पंजाबच्या खेमकरण क्षेत्रामध्ये रात्री ३ वाजता भारतीय रडार्सने चार पाकिस्तानी F-16 विमानांचा ताफा भारतीय हद्दीत येत असल्याचे पकडले. त्यानंतर भारतीय वायू सेनेने तत्काल हरकत मध्ये येत सुखोई-30 आणि मिराज लढाऊ विमानांनी प्रतिउत्तर कारवाई केल्याने पाकिस्तानी लढाऊ विमानांनी माघार घेतल्याची माहिती मिळाली आहे.
Sources: At 3 AM today, Indian radars detected a large sized UAV & package of 4 Pakistani F-16s flying close to Indian border in Khemkaran sector in Punjab. India scrambled Su-30MKIs & Mirage jets in response after which the Pakistani jets retreated further into their territory. pic.twitter.com/ZKTbw8zPZo
— ANI (@ANI) April 1, 2019
सदर पाकिस्तानच्या हवाई घुसखोरीबद्दल भारतीय संरक्षण दलाकडून अजून कोणतीही पुष्टी करण्यात आली नसून या गोष्टीमुळे पाकिस्तान आपल्या नापाक हरकती थांबवत नसल्याचेच चित्र दिसत आहे.