मुंबई : शिंदे गटाच्या “महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. फडणवीस आणि शिंदे गटाकडून एकीकडे बॅनरवार सुरु झाला आहे तर दुसरीकडे शिंदे गट आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. “बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही,’ अशा शब्दांत भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भाजपला इशारा दिला आहे.
संजय शिरसाट म्हणाले,’वाजपेयींच्या काळामध्ये 1 मताने सरकार पडलं होतं याचा विचार भाजपने करायला पाहिजे. हातात हात घेऊन पुढे चालावं. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये अवघड होईल, असा थेट इशारा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे.
तत्पूर्वी, भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करत म्हणाले होते,’मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा आदरच आहे. मात्र, त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत आहेत, असे वाटते. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना मुंबई म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र वाटायचा. तसेच, एकनाथ शिंदेंना आता ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र वाटत आहे. मात्र, ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही. त्यामुळे बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही. त्यामुळे एका जाहिरातीत दावा केला म्हणून आम्हाला काहीही फरक पडत नाही.’ त्यांच्या त्या टीकेवर आता शिंदे गटातील नेत्यांकडून प्रतिउत्तर येत आहे,