पुणे: भाजप येणार भाजप येणार अशा घोषणा दिल्या जात आहेत. मात्र निकालानंतर भाजपचा फुगा फुटणार आहे. असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी नामांकित वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वर्तवलं आहे. वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतील यावर आम्ही मान्यता प्राप्त पार्टी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच आपण दुष्काळ दौरा करत आहोत मात्र मार्केटिंग करत नाही असा टोला त्यांनी लगावला.
यापूर्वी, यंदाच्या निकालात भाजपला 148 ते 200 जागा तर काँग्रेसला 100पर्यंत जागा मिळतील, असे भाकीत आंबेडकरांनी केले होते. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर एच.डी.देवेगौडा हे पंतप्रधान व्हावेत, असे मत व्यक्त केले होते. तर शरद पवारांना मी पंतप्रधानपदाच्या लायक मानत नाही. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि केसीआर हे देखील कधीच पंतप्रधान होणार नाहीत, असेही आंबेडकर म्हटले होते.