बेल्हे -उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जा, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित प्रश्नांवर बैठक घेऊन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन पत्राद्वारे दिल्याने भारतीय ग्राहक पंचायत समितीने सुरू केले उपोषण तूर्तास मागे घेत असल्याचे संघटनमंत्री बाळासाहेब औटी यांनी सांगितले. तर आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले.
बिबट्याप्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्यांसह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने राजुरी (ता. जुन्नर) येथे सोमवार (दि. 17) पासून बेमुदत उपपोषण सुरू केले होते. मात्र, आमदार अतुल बेनके यांनी मंत्रीस्तरावर यासंदर्भात बैठक घेण्याचे निश्चित करून करून शासनाशी याबाबत यशस्वी मध्यस्थी केली.
तसेच मंत्र्यांनी पाठवलेल्या पत्राला मान देऊन उपोषण मागे घेतल्याचे औटी यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, पंचायत समिती सदस्या अनघा घोडके, जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, सरपंच एम. डी. घंगाळे, पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर उपस्थित होते.