सातारा – शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधताहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. साताऱ्यात शिंदे गटाकडून कार्यकर्त्यांचे फॉर्म भरून घेतले जात आहेत यावरूनच आता सातारा दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधलाय.
शिंदे गटाकडून साताऱ्यात कार्यकर्त्यांकडून समर्थन फॉर्म भरून घेतले जात आहेत. शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय, असा सवाल आदित्य ठाकरेंना यावेळी एका वृत्तवाहिनीने विचारला असता, ते म्हणाले, खोटं बोलायचं असेल तर ते काहीही बोलू शकतात. कदाचित ते उद्या अमेरिकेतूनही समर्थन फॉर्म भरून घेऊ शकतात, याला काही अंत नाही.असा खोचक टोला यावेळी ठाकरेंनी लगावला.
प्रामाणिक लोक जनतेला आवडत असतात. उद्धव ठाकरे हे प्रामाणिक असून जनतेच्या मनातील माणूस आहे. शिवसेना पक्षात झालेली गद्दारी जनतेला पटलेली नाही,हे गद्दारांचं सरकार आहे. हे सरकार नक्की कोसळणार असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.