जळगाव – आजपासून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. मात्र आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी जळगावातील राजकारण चांगलच तापल्याचे समजते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आदित्य ठाकरे यांचा जळगावातील दौरा महत्वाचा आहे.
आदित्य ठाकरे हे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात सभा घेणार असल्यामुळे या ठिकाणी वातावरण चांगलच गरम झालं आहे. धरणगावमध्ये अज्ञातांनी आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीने पावले उचलायला सुरुवात केली आहे.
घडलेल्या प्रकारामुळे शिवसैनिक चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळले. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आदित्य ठाकरेंच्या सभांना ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत होता. आता आदित्य ठाकरे जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांच्यासह इतर माजी पदाधिकाऱ्याबद्दल काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.