विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे दुसरे महत्वाचे पाऊल
मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेनेकडून महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘जन आशिर्वाद यात्रा’ सुरू करणात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. यापुर्वी शिवसेनेकडून ‘आदित्य संवाद’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यातच आता आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेला जे यश मिळाले त्याचे आभार व्यक्त करत आगामी विधानसभेसाठी जनतेपर्यंत पोहचण्यासाठी शिवसेनेचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार आणि ज्यांनी दिली नाहीत त्यांची मनं जिंकायची आहेत… अशा मथळ्याखाली सेनेकडून या जनआशिर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील तळागाळातील जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या यात्रेला राजकियदृष्या अधिक महत्व मिळाले असल्याचे दिसत आहे.