जलयुक्त व हरित करून हवेली तालुक्यातील फुलगाव गावाचा विकास साध्य करणारे माजी उपसरपंच राहुल नंदाराम वागस्कर यांनी लोकनियुक्त सरपंच आणि सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आदर्श सरपंच पोपटराव पवार यांचा आदर्श समोर ठेवत गावाचा भरीव विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा. “ग्रामविकासाचे शिल्पकार’ म्हणूनही त्यांची आज फुलगावात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
हवेली तालुक्यातील फुलगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राहुल नंदाराम वागस्कर हे उदयोन्मुख नेतृत्व आहे. घेतलेला विषय तडीस नेणे, दिलेला शब्द पाळणे, विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन त्याचा पाठपुरावा करणे, या गुणकौशल्यांमुळे राहुल वागस्कर यांचा लौकिक आहे. एखादी व्यक्ती एखादे काम घेऊन राहुल वागस्कर यांच्याकडे गेली आणि ते झाले नाही असे होत नाही. नागरिकांनी मांडलेला प्रत्येक विषय त्यांच्या लवकर लक्षात येतो. त्या विषयाची व्याप्ती लक्षात घेत त्या विषयाला तडीस नेण्यासाठी राहुल वागस्कर सातत्याने प्रयत्नशील राहतात.
राहुल वागस्कर हे समाजकारणात जयहिंद तरुण मंडळाच्या माध्यमातून उतरले त्यांनी मंडळाचे अध्यक्षपद भूषवल्याने त्यांचा गावात जनसंपर्क वाढला. ते गावातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतोच. याच माध्यमातून ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून आले त्यातूनच त्यांना उपसरपंचपदाची संधी मिळाली आणि त्याचे त्यांनी सोने केले. गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, तसेच संपूर्ण बाबींचा आढावा घेऊन समस्या दूर करून जनतेशी संवाद साधून समस्या सोडविणे, अपघातग्रस्तांना आर्थिक मदत पुरविणे, मृतकाच्या घरी सांत्वन भेट देऊन आर्थिक मदत करणे, कार्यकर्त्यांशी कोणताही दुजाभाव न करता मनमोकळेपणाने संवाद साधणे, नागरिकांच्या समस्या परस्पर जाणून घेणारा एकमेव नेता म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते.
गावाच्या सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन आरोग्य, शिक्षण, कृषी, बांधकाम अशा सर्वच क्षेत्रात जातीने लक्ष देऊन गावाच्या विकासासाठी उपसरपंच असतानाही आता पद नसतानाही दिवसरात्र झटणारे नेतृत्व म्हणजेच राहुल वागस्कर. राहुल वागस्कर यांनी रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचे काम करून त्यांनी गावात विकासाची दिशा स्पष्ट केली असून गावातील विविध प्रश्न तडीस नेण्यासाठी ते दिवसरात्र झटत आहेत. दळणवळणाच्या साधनांइतकेच, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणे ही सर्वसामान्यांची गरज असते त्याच दृष्टीने गावात साडेतीन कोटी रुपयांची जलजीवन योजना आणली असून तिचे कामही सुरू झाले असून लवकरच घराघरात नळाद्वारे पाणी मिळणार असल्याने फुलगावची पाणी समस्या नाहिशी होणार आहे. सरपंच मंदानानी साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे चिरंजीव पै. किरण साकोरे, राजेंद्र खुळे आणि इतर सर्व सहकारी यांच्या सहकाऱ्याने विकासकामे जोमात करण्यात आली.
प्रमुख विकासकामे
गावातील प्रमुख पण प्रलंबित असलेला खुळे चौक-महादेव मंदिरापर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण
गणेश मंदिर परिसरात सीएसआर फंडातून कॉंक्रिटीकरण
ग्रामपंचायतीची आकर्षक दुमजली इमारत उभारली
अंगणवाडीपासून दोन्ही शाळांचा विकास केला. यात विद्यार्थ्यांना गणवेशापासून ई लर्निंग सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या
सीएसआर फंडातून अंगणवाडीपासून शाळा बोलक्या केल्या.
आगामी ध्येय
गावातील प्रमुख पण प्रलंबित असलेले रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
गावात 5 ते 10 वीपर्यंतची शाळेत सोय आहे, त्याऐवजी 12वीपर्यंत शिक्षणासाठी सोय उपलब्ध करावयाची आहे.
गावातील पथदिवे पूर्णपणे सोलरवर करावयाचे आहेत.
सौरऊर्जा…प्रगतीचा महामार्ग!
फुलगाव ग्रामपंचायतीची संपूर्णपणे वीज ही सोलर प्लॅंटवर कार्यान्वित आहे. ही पहिलीच सोलरवरील ग्रामपंचायत ठरली असल्याची राहुल वागस्कार आवर्जून सांगतात. तसेच आगामी काळात गावातील सगळे पथदिवे सोलर प्लॅंटवर कसे करता येतील यासाठी प्रयत्न सुरू असून गाव उजळून निघण्यासाठी
सौरऊर्जेद्वारे झिरो वीजबिल हे ध्येय लवकरच गाठण्याचा प्रयत्न असल्याचे वागस्कर यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरणावर भर
गावात सीएसआरसोबतच इतर जे काही फंड आले त्यातून महिला बचत गटाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे ध्येय घेतले आहे. यातून महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. गावात 12 महिलांचा एक असे एकूण 40 गट असून त्यांच्याद्वारे गावात वर्षभरात एक लाख वृक्ष तयार करावयाचे. हे वृक्ष कंपनी खरेदी करणार आणि सरकारी मूल्यानुसार खरेदी केले तर महिलांना एक नर्सरी तयार करून घेणार आहोत. दरवर्षी जर हा प्रोजेक्ट साध्य झाला तर मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे गावातील गायरान जागेत त्याच कंपनीच्या माध्यमातून लावायचे किंवा ग्लोबल ग्रुपच्या माध्यमातून गाव हरीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शुद्ध पाण्यासाठी ऑरो प्लॅंटर
गावात पाण्याची समस्या होती त्यावेळी गावात एकच आरो प्लॅंट कार्यरत होता; मात्र लोकसंख्येच्या मानाने हा प्लॅंट तोकडा पडत होता म्हणून वागस्कर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणखी दोन प्लॅंट बसवून नागरिकांना मीटरद्वारे शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला.
संकलन : लक्ष्मण गव्हाणे, कोरेगाव भीमा
==========================