नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चालले होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार करण्यात आले.
दरअसल ये कार नहीं पलटी है, राज़ खुलने से सरकार पलटने से बचाई गयी है.
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 10, 2020
आता उत्तर प्रदेशात राजकारणाला सुरूवात झाली आहे. या चकमकीवरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारवर आरोप केले आहेत. खरंतर ही गाडी उलटली नाही. काही माहिती उघड झाल्यास सरकार पडण्यापासून वाचवण्यात आले आहे, असा गंभीर आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरून सरकारवर निशाणा साधला.