actor gaurav khanna: ‘अनुपमा’ फेम आणि ‘बिग बॉस 19’ मध्ये झळकणारा लोकप्रिय अभिनेता गौरव खन्ना सध्या चर्चेत आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे होत आहेत. गौरवने अभिनेत्री आकांक्षा चमोला हिच्याशी लग्न केलं असून दोघांच्या प्रेमकहाणीची सुरुवात अतिशय फिल्मी पद्धतीने झाली होती. पहिल्या नजरेतलं प्रेम गौरव आणि आकांक्षा यांची पहिली भेट एका ऑडिशनवेळी झाली. गौरवला आकांक्षा पाहताच तिच्यावर प्रेम जडलं. त्या वेळी आकांक्षाला गौरवबद्दल काही माहिती नव्हती, त्यामुळे गौरवने स्वतःला इंडस्ट्रीत नवा असल्याचं सांगितलं. ती त्याला अभिनयाचे टिप्स देत होती, तेव्हा तिला जाणवलं की गौरव अजिबात नवखा नाही. हळूहळू दोघांचं बोलणं वाढलं आणि ते प्रेमात पडले. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी २४ नोव्हेंबर २०१६ रोजी कानपूरमध्ये लग्न केलं. या विवाहाला पूजा बॅनर्जी, अनुज सचदेवा यांसारख्या अनेक टीव्ही कलाकारांनी उपस्थिती लावली होती. वयात ९ वर्षांचा फरक गौरव सध्या ४३ वर्षांचा आहे, तर आकांक्षा ३४ वर्षांची आहे. म्हणजे दोघांमध्ये ९ वर्षांचा वयाचा फरक आहे. तरीही गौरव नेहमीच म्हणतो की, “वय कधीही आमच्या नात्यात अडथळा ठरलं नाही. आमचं नातं विश्वासावर आणि समजुतीवर टिकलेलं आहे.” बाळ नसण्याबाबत गौरवचा खुलासा ‘बिग बॉस’च्या घरात संवादादरम्यान सहकलाकार मृदुल याने गौरवला विचारलं, “तुमच्या लग्नाला किती वर्षे झाली? आणि तुम्हाला मुलं आहेत का?” त्यावर गौरवने शांतपणे उत्तर दिलं, “लग्नाला ९ वर्षे झाली… पण आमचं बाळ नाही. कारण माझ्या पत्नीला बाळ नको आहे.” हे ऐकून मृदुल आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, “आणि तुला?” यावर गौरव हसत म्हणाला, “मला हवं होतं, पण आमचं लव्ह मॅरेज आहे. तिला जे योग्य वाटतं, ते मी मान्य करतो. प्रेम केलंय तर तिचा निर्णयही मान्य करावा लागतो.” गौरव पुढे म्हणाला, “मूल सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. आम्ही दोघंही कामात व्यस्त असतो. बाळाला इतरांकडे ठेवायचं मला योग्य वाटलं नाही. त्यामुळे ती म्हणाली की आत्ता नाही. मीही तिचं म्हणणं ऐकलं.” आकांक्षा चमोला कोण आहे? आकांक्षा चमोला ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने ‘स्वरागिनी’ या मालिकेतून करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर इतर काही मालिकांमध्येही अभिनय केला. गौरव आणि आकांक्षा यांचं लग्न आजही समजुती, प्रेम आणि परस्पर आदरावर आधारलेलं आहे. जरी त्यांना अपत्य नसल्याची खंत गौरवच्या मनात असली, तरी तो म्हणतो, “प्रेमात निर्णय एकाचा असतो, पण त्यामागे दोघांचीच साथ असते.”