“राहुल गांधींनी बिहारमध्ये यात्रा नाही तर हज यात्रा करावी” ; ‘या’ माजी काँग्रेस नेत्याचे वादग्रस विधान

Acharya Pramod ON Rahul Gandhi। काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मतदार हक्क यात्रा काढली होती. त्यांच्या या यात्रेवरून आता काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. आचार्य प्रमोद यांनी,”राहुल गांधींनी बिहारमध्ये यात्रा करू नये, त्यांना बिहारमध्ये प्रवास करून काही फायदा होणार नाही. आचार्य प्रमोद पुढे म्हणाले की राहुल गांधींनी हज यात्रेला जावे.” असा सल्ला दिला आहे.
आचार्य प्रमोद काय म्हणाले? Acharya Pramod ON Rahul Gandhi।
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमधील मतदार हक्क यात्रेवर टीका करताना आचार्य प्रमोद कृष्णम यांनी हे विधान केले आहे. आचार्य यांनी, “राहुल गांधींनी बिहारमध्ये प्रवास करू नये, त्यांना बिहारमध्ये प्रवास करून काही फायदा होणार नाही, त्यांनी हज यात्रेला जावे. जर निवडणूक आयोग चोर असेल तर राहुल गांधींनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. उत्तर प्रदेशातील ३०/३५ खासदार निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र घेऊन आले आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा. जर निवडणूक आयोग चोर असेल तर सरकारला हिमाचल प्रदेश, तेलंगणामध्ये राहण्याचा अधिकार नाही. या निवडणूक आयोगाच्या प्रमाणपत्राने संसदेचे सर्व सदस्य जिंकले आहेत.”असे म्हणत राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिले.
राहुल गांधी एक असामान्य व्यक्ती
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी यांनी पुढे बोलताना, “मतचोरीचे तुमचे आरोप मानसिक दिवाळखोरीचा पुरावा आहेत. ज्या व्यक्तीला आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर कसा करायचा हे माहित नाही, ज्याला आपल्या संस्कृतीचा आदर कसा करायचा हे माहित नाही, ज्याला आपल्या देशाचा आदर कसा करायचा हे माहित नाही, तो कोणत्याही संस्थेचा आदर करू शकत नाही. १५० वर्षे जुन्या काँग्रेस पक्षाला राहुल गांधींना संपवण्यासाठी १५ वर्षे लागली. विरोधकांनी राहुल गांधींना आपला नेता म्हणून स्वीकारले आहे, विरोधकांचे काय होईल. राहुल गांधींचे कृत्य, त्यांची देहबोली, त्यांची शब्दसंग्रह, त्यांची वागणूक, असे दिसते की ते एक असामान्य व्यक्ती आहेत.”असे म्हणत राहुल गांधी यांवर टीका केली.
आचार्य प्रमोद यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीवरही भाष्य
भारतीय जनता पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्याबद्दल आपले मत मांडताना आचार्य प्रमोद म्हणाले की, “मी संपूर्ण विरोधकांना आवाहन करू इच्छितो की राधाकृष्णन हे खरे देशभक्त आहेत. मी विरोधी पक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्याविरुद्ध कोणताही उमेदवार उभा करू नये, त्यांना बिनविरोध निवडून द्यावे. भाजप, एनडीएने घोषित केलेल्या या चांगल्या उमेदवाराला उपराष्ट्रपती पदाचे समर्थन करायला हवे, पण ते तसे करणार नाहीत.”
RSS बद्दल आचार्य प्रमोद काय म्हणाले? Acharya Pramod ON Rahul Gandhi।
आचार्य प्रमोद पुढे म्हणाले, “पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून संघाबद्दल बोलले आहे. यावर मी असे म्हणू इच्छितो की हे भारत, हे राष्ट्र एक मंदिर आहे आणि संघाचे मुख्यालय त्याचे गर्भगृह आहे. संघ हा कोणत्याही एका धर्माचा, एका पंथाचा, एका राजकीय पक्षाचा, एका विचारसरणीचा संघ नाही. संघ राष्ट्राच्या उभारणीत गुंतलेला आहे, तो राष्ट्राच्या उत्थानाची आणि राष्ट्राच्या एकतेची ज्योत पेटवणारा, राष्ट्रप्रेम जागृत करणारा संघ आहे. म्हणूनच, पंतप्रधानांनी संघाबद्दल जे काही सांगितले ते योग्य आहे.”





