गडचिरोली – मतदान करून परतत असताना ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेमध्ये ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शंकरपूर या गावात ही घटना घडली असून मतदान करून परत येताना हा अपघात झालेला आहे.
Maharashtra: Three people dead, 9 injured as a tractor overturned near Shankarpur village in Gadchiroli, today. The victims were returning to their village after casting their votes. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/VUOVGjdzJi
— ANI (@ANI) April 11, 2019
आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यामुळे गडचिरोलीमध्ये मतदान करून झाल्यानंतर परत येत असताना हा दुर्देवी अपघात झालेला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही.