Accident News : पुण्यातील कल्याणीनगर अपघाताची आठवण करून देणारी हृदयद्रावक घटना कल्याणमध्ये (Accident News) घडली आहे. पालकांच्या बेजबाबदारपणामुळे एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने घरातील कार घेऊन भरधाव वेगाने गाडी चालवल्याने मोठा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात (Accident News) कल्याणमधील नामांकित उद्योजक श्रीनिवास तांदळे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कल्याण शहरात संतापाची लाट उसळली असून, पालकांच्या हलगर्जीपणावर तीव्र टीका होत आहे. अपघात कसा घडला? कल्याणमधील चांदोरे (चांदोरी) भागातून जाणाऱ्या रिंग रोडवर ही घटना घडली. उद्योजक श्रीनिवास तांदळे हे नेहमीप्रमाणे रात्री सायकलिंगचा व्यायाम करत होते. त्याचवेळी पाठीमागून प्रचंड वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका जबरदस्त होता की तांदळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा हा थरार जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडिओ व्हायरल होत आहे. Accident News अल्पवयीन मुलाने गुपचूप घेतली कार तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १७ वर्षांच्या या अल्पवयीन मुलाने घरातील कारची चावी गुपचूप घेतली आणि तो रिंग रोडवर वेगाने गाडी चालवत सुटला होता. खडकपाडा पोलीस ठाण्याने तातडीने कारवाई करत कार जप्त केली. बुधवारी सकाळी या मुलाला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी महत्त्वाची बाब म्हणजे, अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन सोपवल्याबद्दल त्याच्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. मुलाच्या आईची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच तिच्या विरोधात अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. रिंग रोड बनला ‘डेथ ट्रॅप’ कल्याणचा हा रिंग रोड सध्या बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरील सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स हटवल्यामुळे वाहनांचा वेग अनियंत्रितपणे वाढला आहे. मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला रोज धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी रहिवाशांनी वारंवार केल्या आहेत. तरीही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.