Abhijeet dipke: “भाजपला वाटतं आपण आरएसएसपेक्षा मोठे….” मोहन भागवतांचा उल्लेख करत अभिजीत दीपकेंची टीका
Abhijeet dipke: कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी महत्वाचे विधान केले आहे.

Abhijeet dipke: कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी महत्वाचे विधान केले आहे. त्यांनी ,”भारतीय जनता पक्षाला वाटते की ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा (आरएसएस) मोठे झाले आहेत, परंतु त्यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या शब्दांकडे लक्ष दिले पाहिजे” असा सल्ला त्यांनी दिला आहे.
दीपके यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हे विधान केले. यावेळी त्यांनी, “मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे की भारतीय जनता पक्षाने मोहन भागवत यांचे ऐकले पाहिजे. १२ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर आणि अनेक यंत्रणा आपल्या नियंत्रणाखाली आल्यानंतर भाजपला वाटते की ते आरएसएसपेक्षा मोठे झाले आहेत.”असे म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “मोहन भागवत यांनी पूर्वी म्हटले होते की आंदोलन करणाऱ्या ‘Gen-G ‘ यांना देशद्रोही म्हणू नये. परंतु पंतप्रधानांनी एक नवीन संज्ञा आणली आहे: ‘दिमागी नक्षलवादी.’ यावरून हे स्पष्ट होते की पंतप्रधान मोहन भागवत यांचे ऐकत नाहीत.”
किमान आपण मोहन भागवत यांचे तरी ऐकले पाहिजे Abhijeet dipke:
अभिजीत दीपक म्हणाले की, “एकीकडे आरएसएस प्रमुख सर्वांना सोबत घेऊन जाण्याबद्दल आणि मुलांचा अनादर न करण्याबद्दल बोलतात, तर दुसरीकडे पंतप्रधान असे शब्द वापरतात, आणि हे चांगले नाही. दीपक म्हणाले, “त्यांनी किमान त्यांचे मार्गदर्शक असलेल्या मोहन भागवत यांचे तरी ऐकले पाहिजे. ते (भाजप) आरएसएसमुळेच सत्तेत आहेत.”
दीपके यांनी ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले की, आंदोलक इंडिया गेटवर जमतील आणि पोलीस मुख्यालयाकडे मोर्चा काढतील. “हा एक शांततापूर्ण मोर्चा असेल आणि मला विश्वास आहे की तो जंतर मंतरवरील मोर्चापेक्षा मोठा असेल.”
५ सप्टेंबरच्या मोर्चाबद्दल दीपके काय म्हणाले Abhijeet dipke:
दीपके म्हणाले की, दोन मागण्यांसह आंदोलन पुन्हा सुरू होत आहे. पहिली मागणी म्हणजे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले एफआयआर मागे घ्यावेत आणि नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी.
ते म्हणाले, “जंतर मंतरनंतर आम्ही ज्या केंद्रीय मंत्र्यांशी बोललो, त्यांनी या मागण्या मान्य केल्या. पण सरकारशी वारंवार चर्चा करूनही कोणताही तोडगा निघालेला नाही. आता आम्हाला वाटते की सरकार मुद्दाम प्रक्रियेला विलंब लावत आहे, ज्यामुळे आमच्याकडे आंदोलन पुन्हा सुरू करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.”
त्यांना एफआयआर दाखल करू द्या
‘ स्कूल ठीक करो’ मोहिमेसाठी आपल्याविरुद्ध दाखल झालेल्या नवीन एफआयआरबद्दल चिंता वाटते का, असे विचारले असता, दीपक म्हणाले, की त्यांना काही फरक पडत नाही. “त्यांना एफआयआर दाखल करू द्या. हा पहिलाही नसेल आणि शेवटचाही नसेल. मला त्याची पर्वा नाही. जेव्हा मी अमेरिकेतून परत आलो, तेव्हाच मी ठरवले होते की एक दिवस मला तुरुंगात जावे लागेल.”





