Abhijeet Deepke: “जर मी मुस्लिम असतो तर…” ; कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांच्या विधानामुळे गदारोळ
Abhijeet Deepke: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी जंतर मंतरवर आंदोलन करत आहे.

Abhijeet Deepke: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांना सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचा पाठिंबा मिळाला आहे.
तरुण आणि विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी वांगचुक यांनी जंतर मंतरवर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, अभिजित दीपके यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. (Abhijeet Deepke)
जंतर मंतरवर एका मुलाखतीत सीजेपीचे संस्थापक दीपके यांनी, “जर मी खालिद किंवा मुस्लिम असतो, तर आतापर्यंत तुरुंगात असतो. मला याची जाणीव आहे.” असे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर, दिल्ली दंगलीशी संबंधित आरोपांखाली जवळपास पाच वर्षांपासून तुरुंगात असलेल्या उमर खालिदबद्दल चर्चा सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाही.
विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवरून जंतर मंतरवर आंदोलन (Abhijeet Deepke)
अभिजीत दीपक (Abhijeet Deepke )अमेरिकेतून परतले असून, नीट पेपरफुटी, एनटीएमधील गैरप्रकार आणि एसएससी पेपरफुटी यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला तरुण आणि विरोधी पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीयही त्यांच्या आंदोलनात सामील होत आहेत.
पीडितांच्या कुटुंबीयांना न्यायासाठी याचना करावी लागते
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणांचा संदर्भ देत, अभिजीत दीपक यांनी सरकारच्या उदासीनतेवर टीका केली आणि पीडितांच्या कुटुंबीयांशी संपर्क न साधल्याचा आरोप केला.
त्यांनी दीप मेघवाल, आकांक्षा चतुर्वेदी, अमिरा कुमार आणि कहान पटेल यांची नावे घेत, त्यांच्या कुटुंबीयांना न्यायासाठी याचना करावी लागत असल्याचे म्हटले. त्यांनी असा आरोप केला की, कोणत्याही सरकारी प्रतिनिधीने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधलेला नाही किंवा मुलांच्या मृत्यूवर खेदही व्यक्त केलेला नाही.
दीपक यांनी सरकारकडे काय मागणी केली?
दिपके म्हणाले, “मला हे समजत नाही की सत्तेत असलेले लोक इतके उदासीन आणि अहंकारी कसे असू शकतात की ज्या कुटुंबांनी आपली मुले गमावली आहेत, त्यांच्याशी संपर्क साधण्याची गरजही त्यांना वाटत नाही.”
ते पुढे म्हणाले, “तुम्ही त्यांची मुले परत आणू शकत नाही, पण किमान तुम्ही त्यांच्या कुटुंबीयांना भेटून खेद व्यक्त करू शकता आणि माफी मागू शकता. एवढं जास्त आहे का?”





