- नऊ लाख 81 हजार वाहनचालंकावर कारवाई
पिंपरी – वाहन चालकांना आर्थिक भूर्दंड बसला की वाहतुकीला शिस्त लागेल, असा पोलिसांसह नागरिकांचा समज होता. याकरिता बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा झपाटा सुरू आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी चिंचवड आयुक्तालय सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत नऊ लाख 81 हजार 390 वाहन चालकांवर कारवाई झाली. या कारवाईतील अवघा सात कोटी 88 लाखांचा दंड वसूल झाला आहे. तर 25 कोटी 51 लाख 25 हजार 900 रुपयांचा दंड अद्याप वसूल होणे बाकी आहे.
वाहतूक पोलीस कारवाई करताना पैसै खातात, असा आरोप नेहमी होत असतो. यापुढील काळात असा आरोप होऊ नये म्हणून रोखीने कोणताच दंड स्वीकारायचा नाही, असे आदेश गृह विभागाने दिले. त्यामुळे दंड वसूल करताना तो एटीएम कार्डने वसूल केला जाऊ लागला. त्यातही अनेकदा वाहन चालकांशी वाद होतात. हा वाद टाळण्यासाठी तसेच वाहन चालकांवरील कारवाईल गती मिळावी यासाठी वाहनांचा क्रमांक घेऊन चालकाच्या मोबाइलवर कारवाई आणि दंडाची माहिती पाठविली जात आहे. पुन्हा कधीतरी वाहतूक पोलिसांनी पकडल्यास संबंधित वाहन चालकाकडून पैसे वसूल केले जातात. मात्र हे प्रमाण अत्यंत अल्प आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यापासून वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांवर नऊ लाख 81 हजार 390 केसेस केल्या. या केसेसमध्ये तब्बल 33 कोटी 40 लाख एक हजार 550 रुपयांचा दंड आकारण्यात आला. यापैकी दोन लाख 61 हजार 936 वाहन चालकांनी सात कोटी 88 लाख 75 हजार 650 रुपयांचा दंड भरला. उर्वरित सात लाख 19 हजार 454 केसेसमध्ये वाहन चालकांनी 25 कोटी 51 लाख 25 हजार 900 रुपयांचा दंड वाहन चालकांनी भरलेलाच नाही.
दहा दिवसात 350 बुटेलवर कारवाई
सायलन्सर बदलणाऱ्या बुलेट चालकांवर कारावाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिले. त्यानंतर 18 ऑक्टोबरपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरवात केली. गेल्या दहा दिवसात 350 बुलेट चालकांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली