राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार Top 10 News : राज्यात नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना भावनिक आवाहन करत त्यांचे पक्ष सोडण्याच्या निर्णयाचे मत परावर्तित केले होते, त्यामुळे राज्यात एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर उधळून लावल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडं ठाकरे गटावरील फोडाफोडीचं संकट अजून टळलं नाहीये, त्याचे कारणं असं की, शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी ऑपरेशन टायगर होणारच असं विधान केलंय.ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी होणार, जे पण होणार योग्य वेळी होणार असल्याच विधान करत ज्योति वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंची चिंता पुन्हा वाढवलीय. अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपचं लोटस ऑपरेशन असो किंवा राष्ट्रवादी पक्षातील विभाजन, यावरून राज्याच लक्ष वेधल्या गेलं होतं. राज्यभरात पुन्हा पाऊस अन् गारपीटीचे संकट राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोंगावणार असल्याची शक्यता आहे. 30 मार्चपासून राज्यात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. तर उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलाय. दरम्यान, 30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाच प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचं प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळं या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतरचा वादळी पाऊस, आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावं चर्चेत अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकर यांना चांगलेच भोवलंय,कारण त्यांना या प्रकरणी महिला आयोगाच्या पदाच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, आता त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे. हे महत्वाचे पद असल्यामुळे अनेक महिला नेत्यांनी हे पद मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच यासाठी सध्या ५ नावांची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सना मलिक, सरोज अहिरे, वैशाली नागवाडे, राजलक्ष्मी भोसले आणि प्रतिभा शिंदे यांची नावं आघाडीवर आहेत. या ५ महिला नेत्यापैकी एकाची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाईल. यापैकी कुणाला संधी द्यायची हे मोठं आव्हान सुनेत्रा पवार यांच्यापुढे आहे. युद्धाचे पडसाद राज्यातील कांद्याच्या भावावर एकीकडे अवकाळी संकट, आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडलाय. अशातच आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दरात 50 टक्के घसरण झालीय. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होतंय. Onion Price crash अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी केवळ 300 ते 800 रुपये प्रतिक्विटल इतका कमी दर मिळतोय. हा दर उत्पादन खर्चाच्या निम्म्याहूनही कमी आहे. कांदा दरातील घसरण थांबवण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं बाजार हस्तक्षेप योजना लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केलीय. दरम्यान यावर लवकर तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट आणखी गडद होण्याची चिन्ह आहेत. अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? Top 10 News : भोंदूबाबा अशोक खरात यांच्याभोवतीचा चौकशी यंत्रणांचा फास आता आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. सध्या अशोक खरात याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी सुरु आहे. मात्र, आता या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारात गुंतलेल्या अनेक राजकारण्यांना धडकी भरवणाऱ्या ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. अशोक खरात याने हवाला रॅकेट आणि व्याजाच्या धंद्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचे आतापर्यंतच्या विशेष तपास पथकाच्या चौकशीतून समोर आले आहे. अशोक खरात हा आर्थिक गैरव्यवहाराचे मोठे रॅकेट चालवायचा असा संशय पोलिसांना आहे. खरात हा त्याच्या संपर्कातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक आणि राजकारण्यांचा काळा पैसा जमा करुन तो व्याजाने द्यायचा, अशी शक्यता आहे. याशिवाय, तो हवालामार्फत देश-विदेशात तो शेकडो कोटींची हेराफेरी करत आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता त्याची ईडी मार्फत चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. आरबीआयचा या बँकांना दणका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं वेगवेगळ्या नियमांचं आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं तीन सार्वजनिक बँकांवर कारवाई केली आहे. या तीन बँकांना मिळून 2 कोटी 17 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं यूनियन बँक ऑफ इंडियावर 95.40 लाख रुपये, बँक ऑफ इंडियावर 63.60 लाख रुपये आणि बँक ऑफ इंडियावर 58.50 लाख रुपयांचा दंड ठोठवला आहे. याशिवाय फिनटेक कंपनी पाइन लॅब्सवर देखील तीन लाख 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. दरम्यान,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार यूनियन बँक ऑफ इंडियावर फसवणुकीच्या रिपोर्टिंगची योग्य व्यवस्था न केल्यानं आणि इतर कारणांसाठी दंड लावलाय. तरआरबीआयनं बँक ऑफ इंडियावर प्राथमिक क्षेत्राला कर्ज देण्यासंदर्भात आणि व्याज जमा करण्यासंदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय. तसेच सेट्रल बँक ऑफ इंडियावर केवायसी आणि बचत बँक खात्यासंदर्भातील नियमाचं उल्लंघन केलं म्हून 63.60 लाख रुपयांचा दंड करण्यात आलाय. रेमंडचे विजय सिंघानिया काळाच्या पडद्याआड देशातील नामांकित उद्योगपती, रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते विजयपत सिंघानिया यांचं वयाच्या 87 व्या वर्षी मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आणि रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी दिली. उद्योग, विमान चालन आणि सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या या दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या जाण्यानं अनेकांनी दुःख व्यक्त केलं. विजयपत सिंघानिया हे केवळ उद्योगपती नव्हते, तर ते एक कुशल एव्हिएटर म्हणूनही ओळखले जायचे. हॉट एअर बलूनद्वारे सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. रेमंड या वस्त्र ब्रँडला देश-विदेशात ओळख मिळवून देण्यात विजयपत सिंघानिया यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रेमंडने जागतिक स्तरावर झेप घेतली. दरम्यान , त्यांच्या जाण्याने उद्योग क्षेत्रातील एक मोठं युग संपल्याची भावना व्यक्त केली जातीय. रशिया करणार जगाची तेलकोंडी इराण-अमेरिका यांच्यातील युद्धानं जगावर तेल संकट गडद झालं असताना आता रशियानं मोठं पाऊल उचललंय. रशियानं आपल्या देशात इंधनाचा तुटवडा उद्भवू नये म्हणून जगाला इंधन पुरवठा करणं थांबवणार आहे. इंधन उत्पादन क्षेत्रातील प्रमुख देशांपैकी एक रशिया आहे. देशांतर्गत इंधनाच्या किमती स्थिर करण्यासाठी रशियन सरकारनं मोठी पावले उचलली आहेत. इराण-अमेरिका युद्धामुळे इंधनाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसत आहेत. रशियानं 1 एप्रिलपासून पेट्रोलच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणलाय. ही बंदी केवळ काही आठवड्यांसाठी नाही तर तब्बल चार महिने, म्हणजेच 31 जुलैपर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे. रशियाच्या निर्णयामुळे चीन, तुर्की, ब्राझील, आफ्रिका आणि सिंगापूर यांसारख्या थेट पेट्रोल आयात करणाऱ्या देशांच्या ऊर्जा बाजारात मोठा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. तसेच ट्रम्पनंतर पुतीन यांनी ‘रशिया फर्स्ट’चा पवित्रा अवलंबिला असल्याचं दिसतंय. गतविजेत्या बंगळुरूने फोडला विजयाचा नारळ आयपीएल 2026 हंगामाची सुरुवात अतिशय धमाकेदार झाली. काल झालेल्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादवर शानदार विजय मिळवला. बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने 6 विकेट्स राखून सहज विजय मिळवत हंगामाची विजयी सुरुवात केली. या विजयासह त्यांनी पॉइंट्स टेबलमध्ये आपलं खात उघडत 2 गुणांची कमाई केली. या विजयामुळ गतविजेत्या आरसीबीनं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली असून, यंदाच्या हंगामात ते पुन्हा विजेतेपदासाठी सज्ज असल्याचे संकेत दिलेत. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 202 धावांचे लक्ष्य ठेवले, जे आरसीबीने 16 व्या षटकात पूर्ण केले आणि 6 गडी राखून सामना जिंकला. बिग बॉसच्या घरातून प्रभू शेळके बाहेर Top 10 News : बिग बॉसच्या घरात 11 वा आठवडा सुरू आहे. बिग बॉस आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. या आठवड्यात घरात डबल एलिमिनेशन होणार आहे. डबल एलिमिनेशनमध्ये काल भाऊच्या धक्क्यावर प्रभू शेळकेने घराचा निरोप घेतला. प्रभूच्या एक्झिटने तन्वीला खूप वाईट वाटले. तन्वी आणि घरातील इतर सदस्य देखील खूप भावुक झाले. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यात शेवटी Danger झोनमध्ये रेवा कौरासे आणि प्रभू शेळके उरतात. त्यातून प्रभू एलिमिनेट होतो. प्रभू शेळकेने बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर प्रेक्षकांचे आभार मानले. आता प्रभू शेळके नंतर बिग डबल एलिमिनेशनमध्ये बिग बॉसच्या घरातून कोणाचा पत्ता कट होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोशल मीडियावर संकेत पाठकच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. याचा खुलासा आता आज रितेश भाऊच्या धक्क्यावर करणार आहेत. त्यामुळे आता घरा बाहेर जाणारा तो दुसरा स्पर्धक कोण असेल हे पाहणं गरजेचं आहे.