Mudragada Padmanabha। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक नेत्यांनी मतदारांना अनेक आश्वासन दिले. त्यात निवडणून येणारे उमेदवार ती आश्वासनं किती पूर्ण करतील हे येणारा काळच ठरवेल. मात्र या निवडणुकीत आंध्रप्रदेशमधील एका नेत्याने विरोधी पक्षाला दिलेले अजब आव्हान पाळल्याची घटना समोर आलीय. आंध्रप्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदी पवन कल्याण यांनी शपथ घेतल्यानंतर वायएसआर काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने स्वतःचे नाव बदलले आहे. काय आहे नेमकं प्रकरण ते समजून घेऊ… नेमकं प्रकरण काय आहे? Mudragada Padmanabha। आंध्रप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली. एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने मोठा विजय मिळवत जगनमोहन रेड्डी यांचे सरकार उलथवून लावले. आंध्रचे माजी मंत्री वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते मुद्रगदा पद्मनाभम यांनी निवडणुकीपूर्वी जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांना आव्हान दिले होते. पवन कल्याण पिथापुरम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. “पवन कल्याण यांचा विजय झाला तर मी माझे नाव बदलून टाकेन”, असे आव्हान मुद्रगदा पद्मनाभम यांनी दिले होते. निकालानंतर पवन कल्याण यांचा मोठा विजय झाला आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यानंतर आता मुद्रगदा पद्मनाभम यांनी स्वतःचे नाव बदलून फक्त “पद्मनाभम रेड्डी” असे ठेवले आहे. याविषयी त्यांनी , “माझ्यावर नाव बदलण्यासाठी कुणीही दबाव टाकला नव्हता. मी स्वतःच्या मर्जीने नाव बदलले.” असे म्हटले. तसेच त्यांनी ट्रोलिंग करणाऱ्यांवरही संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “पवन कल्याण यांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय असभ्य भाषेत माझ्यावर टीका केली. मला हे अयोग्य वाटते. माझ्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्याऐवजी तुम्ही माझ्या कुटुंबालाच का नाही संपवून टाकत.”अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. कोण आहेत मुद्रगदा पद्मनाभम? Mudragada Padmanabha। मुद्रगदा हे आंध्रप्रदेशमधील कापू समुदायाचे मोठे नेते आहेत. कापू समाजाला आरक्षण मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. आंध्रचे माजी मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. निवडणुकीच्या काही महिने आधीच त्यांनी वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. आंध्रप्रदेशमध्ये जगनमोहन यांना धक्का विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांनी आघाडी केली होती. आंध्रप्रदेशमध्ये दोन्ही निवडणुका एकत्रच झाल्या. विधानसभेच्या १७५ जागांपैकी तब्बल १६४ जागी आघाडीचा विजय झाला. तर लोकसभेच्या २५ पैकी २१ जागा दोघांनी जिंकल्या. विधानसभेत टीडीपीला १३५, जनसेना पक्षाला २१ आणि भाजपाल ८ जागांवर विजय मिळाला. तर जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला केवळ २१ जागांवर समाधान मानावे लागले. चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रीपदाची तर पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हेही वाचा ’40 लाखांचे बाथरूम, मसाज सेंटर अन्…’ जगन रेड्डी यांचा 500 कोटींचा राजवाडा वादात