देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचणे जवळजवळ अशक्य असते. अनेक वेळा वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यामुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास बराच वेळ लागतो, त्यामुळे जीवित व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकार प्रथमच दुचाकी वाहनांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्याच्या मानकांची अंमलबजावणी करणार आहे. त्याामुळे येत्या काळात आपल्याला दुचाकी अग्निशमन वाहन आग विझवताना दिसेल.
दुचाकीस्वार अग्निशमन वाहनाच्या मदतीने अग्निशामक जवान घनदाट वस्ती आणि अरुंद रस्त्यांवर लवकर आणि सहज पोहोचू शकतील. याशिवाय वाहन लहान असल्याने घटनास्थळी पोहोचणेही सोपे होईल. याद्वारे दुचाकी वाहने वेगाने फोफावणारी आग, दहशतवादी हल्ला, रस्ते अपघात, भूकंप आणि आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतील.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकीस्वार अग्निशमन वाहनांच्या बांधकाम, फेरबदल व ऑपरेशनसाठी अंतिम मसुदा तयार केला आहे. त्याअंतर्गत वाहनातील आग विझविण्यासाठी आवश्यक उपकरणे देण्यात येतील. या व्यतिरिक्त त्या सर्व उपायांवर नजर ठेवली जाईल, जेणेकरून प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्यासाठी या वाहनांना अधिक चांगला पर्याय बनवता येईल.
दुचाकी अग्निशमन वाहनाची वैशिष्ट्ये :
– दुचाकी अग्निशमन वाहनात आग विझविण्यासाठी एक किलोची बंदूक आणि एक केमिकल असेल.
– वाहनाचा कमाल वेग 50 किमी / ताशी असेल.
– घोषणेसाठी लाऊड स्पीकर्स बसवले जातील.
– वाहनांना निळा इमर्जन्सी लाइट असेल.
– वाहनात सायरन किंवा हूटर असेल.
– वाहन उभे करण्यासाठी मध्यभागी व कडेला दोन स्टॅण्ड देण्यात येतील.
– दुचाकी अग्निशमन वाहन पूर्णपणे हायटेक केले जाईल.
या व्यतिरिक्त ते चालविणाऱ्या कर्मचार्यांना संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हे वाहन रस्त्यावर उतरविले जाईल.