प्रभात वृत्तसेवा वाई – वाई नगरपालिकेत सत्ताधार्यांनी भ्रष्टाचार करून वाई शहराला बकाल बनविले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत तीर्थक्षेत्र विकास आघाडीने विकासाला खीळ घातली. भाजप हा विकासाला साथ देणारा पक्ष असून भ्रष्टाचारी प्रवृतीला थारा देणार नाही. वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या व धनदांडग्यांना पालिकेच्या सत्तेतून हद्दपार करा. पालिकेतील दहशतवाद मोडून काढण्यासाठी भाजपला सत्तेत आणून शहराचा सर्वांगीण विकास करून घ्या, असे आवाहन ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केले. वाई नगरपालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागातील उमेदवार व मतदार संपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष व विधानसभा प्रभारी धैर्यशील कदम, ज्येष्ठ नेते मदन भोसले, तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल सावंत, ज्येष्ठ नेते बापूसाहेब शिंदे, रोहिदास पिसाळ व सर्व प्रभागातील उमेदवार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट्राचारी कार्यपद्धतीवर ना. जयकुमार यांनी हल्ला बोल केला. सत्ताधार्यांनी विकासाच्या नावाखाली वाईकरांची निव्वळ दिशाभूल केली आहे. भाजपच्या उमेदवारांना बहुमतांनी निवडून दया, व भ्रष्ठ सत्ताधार्यांना पालिकेच्या सत्तेतून हद्दपार करा, भाजपला संधी दिल्यास भाजप संधीच सोन केल्याशिवाय राहणार नाही असेही मंत्री गोरे म्हणाले. भाजपचे तीन मंत्री आहेत. वाई शहराच्या पर्यटन विकासासाठी हवा तेवढा निधी देण्यात येईल, तसेच वाई नगरपालिका “क”वर्ग नगरपालिका आहे तिला ब वर्ग नगरपालिका बनविण्याचा शब्द देत असून त्यासाठी वाई नगरपालिकेत भाजपची बहुमताची सत्ता येणे तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रात्रीचा दिवस करून प्रामाणिकपणे काम करा. नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक भाजपचेच निवडून येथील यात तिळमात्र शंका नाही.यावेळी मदन भोसले, धैर्यशील कदम, बापूसाहेब शिंदे यांनी यांनी मनोगत व्यक्त केले.नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी पक्षात माझ्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची घुसमट होत असल्यानेच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार दीपक जाधव यांनी ना. गोरेंच्या उपस्थितीत अनिल सावंत यांना पाठिबा दर्शविला तसेच काही अपक्ष उमेदवारांनी सुध्दा भाजपच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दिल्याने भाजपची ताकद वाढली आहे. ज्या उमेद्व्रांनी पक्षाचा आदेश मानून आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले त्यांचाही सन्मान मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.