पार्सल वाहतुकीतून साडेतीन कोटींचे उत्पन्न
पुणे, मुंबई, कल्याण, भुसावळ, सोलापूर, नागपूर स्थानकांतून गाड्या रवाना
पुणे – देशभरामध्ये मध्य रेल्वेकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी विशेष मालगाड्या आणि पार्सल गाड्या सोडल्या होत्या. यातून 9 हजार 755 टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली. याद्वारे मध्य रेल्वेला सुमारे 3.64 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
लॉकडाऊन कालावधीत भारतीय रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला स्थगिती दिली होती. या कालावधील केवळ मालगाड्या, पार्सल गाड्या आणि श्रमिक विशेष गाड्या सोडण्यात येत होत्या. मध्य रेल्वेकडूनदेखील पुणे, मुंबई, कल्याण, भुसावळ, सोलापूर आणि नागपूर स्थानकांतून सिकंदराबाद, चेन्नई आणि शालिमार या स्थानकांसाठी विशेष गाड्यांतून वस्तू पाठवल्या.
पार्सल गाड्यांना मुदतवाढ
लॉकडाऊन कालावधीमध्ये वाढ करण्यात आल्याने शालिमार आणि चेन्नईसाठी सोडण्यात येणाऱ्या पार्सल गाड्या 30 जूनपर्यंत चालविण्यात येणार आहेत.