नागपूर – पुलावर पाणी असताना धाडस करून गाडी पुढे चालवल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरातील केळवद येथे घडली आहे. बामनमारी नदीच्या पुरात स्काॅर्पिओ गाडी वाहून गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केळवद परिसरात दोन दिवसांपासून संततधारपाऊस सुरु आहे. त्यामुळे बामनमारी नदीला पूर आला आहे. पुलावर पाणी असताना वाहन चालकाने गाडी पुढे काढली. यादरम्यान, पाण्याचा ओढा आल्याने गाडी नदीत वाहून गेली. गाडीत सहा जण प्रवास करत होते. तिघांचे मृतदेह सापडले असून इतर तिघांचा शोध सुरु आहे.