400 ड्रोन, 36 ठिकाणी घुसखोरी…; रात्री झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यांची भारतीय लष्कराने दिली अधिकृत माहिती

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाकिस्तानच्या नापाक कारवायांवर भारताने गुरुवारी पत्रकार परिषदेत परखडपणे भाष्य केले. विदेश मंत्रालयाने आयोजित केलेल्या या परिषदेत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या कुटील हेतूंचा पडदा उघडला. विदेश सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी ८ ते ९ मे च्या रात्री झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यांची सविस्तर माहिती दिली. सर्वात मोठा खुलासा म्हणजे, पाकिस्तानने लेहपासून सरक्रीकपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर ३६ ठिकाणी ३००-४०० ड्रोनद्वारे घुसखोरीचा प्रयत्न केला. ही ड्रोन तुर्की निर्मित असल्याचे तपासात उघड झाले.
पाकिस्तानी लष्कराने भारतीय सैन्य पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हल्ले केले. ३६ ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न करताना ३००-४०० ड्रोन पाठवले गेले. तणाव आणि भारताच्या प्रत्युत्तराच्या शक्यतेनंतरही पाकिस्तानने आपले नागरी हवाई क्षेत्र बंद केले नाही, उलट नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर केला. भारताने प्रत्युत्तरात पाकिस्तानचा आणखी एक एअर डिफेन्स रडार नष्ट केला.
#WATCH | Delhi: Wing Commander Vyomika Singh says, “…Pakistan did not close its civil airspace despite it launching a failed unprovoked drone and missile attack on 7 May at 08:30 hours in the evening. Pakistan is using civil airliner as a shield, knowing fully well that its… pic.twitter.com/U73YyFYj6h
— ANI (@ANI) May 9, 2025
‘लेह ते सरक्रीक: ३६ ठिकाणी ३००-४०० ड्रोनद्वारे घुसखोरी’
कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या, “पाकिस्तानी लष्कराने भारतीय हवाई क्षेत्राचे अनेकदा उल्लंघन केले. नियंत्रण रेषेवर भारी शस्त्रास्त्रांनी गोळीबार केला. लेह ते सरक्रीकपर्यंत ३६ ठिकाणी ३००-४०० ड्रोनद्वारे घुसखोरीचा प्रयत्न झाला. भारतीय सैन्याने अनेक ड्रोन पाडले. या हल्ल्यामागे भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेची चाचणी आणि गुप्तचर माहिती गोळा करण्याचा हेतू होता. ड्रोनच्या अवशेषांचा तपास सुरू असून, प्राथमिक अहवालात तुर्की निर्मित ड्रोन असल्याचे स्पष्ट झाले.”
#WATCH | Delhi: Colonel Sofiya Qureshi says, “..Around 300 to 400 drones were used (by Pakistan) to attempt infiltration at 36 locations…Forensic investigation of the wreckage of the drones is being done. Initial reports suggest that they are Turkish Asisguard Songar drones…” https://t.co/JndIIgFNYh pic.twitter.com/J1wc4gYPDQ
— ANI (@ANI) May 9, 2025
‘यात्री विमानांचा ढाल म्हणून वापर’
“पाकिस्तानने ७ मे रोजी रात्री ८:३० वाजता अयशस्वी ड्रोन आणि मिसाइल हल्ला केल्यानंतरही नागरी हवाई क्षेत्र बंद केले नाही. ते जाणीवपूर्वक नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर करत आहे, हे माहीत असूनही की भारताकडून तीव्र प्रत्युत्तर मिळेल. यामुळे आंतरराष्ट्रीय सीमेजवळ उडणारी नागरी विमाने धोक्यात आहेत,” असे त्यांनी सांगितले. फ्लाइट रडार २४ च्या डेटाचा स्क्रीनशॉट दाखवत त्यांनी नमूद केले की, भारताने हवाई क्षेत्र बंद केल्याने भारतीय आकाश नागरी वाहतुकीपासून मोकळे आहे, तर कराची-लाहौर मार्गावर पाकिस्तानात नागरी विमाने उडत आहेत. भारतीय वायुसेनेने संयम दाखवत आंतरराष्ट्रीय विमानांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली.
#WATCH | Delhi: Wing Commander Vyomika Singh says, “…Pakistan did not close its civil airspace despite it launching a failed unprovoked drone and missile attack on 7 May at 08:30 hours in the evening. Pakistan is using civil airliner as a shield, knowing fully well that its… pic.twitter.com/VaTB61Wqr6
— ANI (@ANI) May 9, 2025
‘प्रत्युत्तरात पाकिस्तानचा रडार उद्ध्वस्त’
पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील तंगधार, उडी, पुंछ, मेंढर, राजौरी, अखनूर आणि उधमपूर येथे भारी तोफा आणि सशस्त्र ड्रोनद्वारे गोळीबार केला. यात भारतीय सैन्याचे काही जवान हुतात्मा झाले. प्रत्युत्तरात भारताने मोठे नुकसान केले. रात्री पाकिस्तानच्या सशस्त्र ड्रोनने बठिंडा सैन्य तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो हाणून पाडला गेला. पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने चार हवाई संरक्षण ठिकाणांवर ड्रोन हल्ले केले, यापैकी एकाने पाकिस्तानचा एअर डिफेन्स रडार नष्ट केला.
#WATCH | Delhi: Foreign Secretary Vikram Misri says, “Yes, the Minister (Dr S Jaishankar) had a conversation with the US Secretary of State. The focus of discussions was the terrorist attack in Pahalgam and the response that India mounted after that on the 7th of May. The… pic.twitter.com/ls1hs1SdiC
— ANI (@ANI) May 9, 2025





