मुंबई – राज्यभरात आज दिवसभरात 3 हजार 623 नवीन करोनाबाधित आढळून आले असून, 2 हजार 972 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याशिवाय, 46 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे.
अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 63,05,788 करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.04 टक्के एवढे झाले आहे.
आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 64,97,877 झाली आहे. राज्यात आजपर्यंत 138142 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,59,79,898 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,97,877 (11.61टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,98,207 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत, तर 1 हजार 892 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत.