बेल्हे -वाशीम, परभणी, यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे 250 मजूर बेल्हे (ता. जुन्नर) येथे अडकून पडले असून त्यांना गावी जाण्यासाठी कोणतीही सोय होत नसल्याने मजूर हताश झाले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 8 मजूर राहत असून इतर मजूर शेतकऱ्यांच्या घरी राहत आहेत.
या सर्वांना आपापल्या गावी जायचे असल्याने त्यांना गावी जाण्यासाठी वाहनांची मदत शासनाने लवकर करावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे. ग्रामस्थ दत्ता खोमणे यांच्या सहकार्याने या मजुरांना दोन वेळचे जेवण दिले जात आहे.