नवी दिल्ली – आम्ही १५ लाख जमा करू असे कोणतंही खोटं आश्वासन देणार नाहीत असे म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लक्ष्य केले. तसेच, मार्च २०२० पर्यंत २२ लाख सरकारी जागांची भरती केली जाईल, अशीही घोषणा राहुल गांधींनी केली आहे. काँग्रेस पक्षाने आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले कि, मार्च २०२० पर्यंत २२ लाख सरकारी जागांची भरती केली जाईल. १० लाख तरूणांना ग्रामपंचायतीमध्ये नोकरी देण्यात येईल. उद्योगधंदा सुरू करण्यासाठी ३ वर्षापर्यंत परवानगीची गरज नसेल. तसेच दरवर्षी ७२ हजार हे गरिबांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असे आश्वासन देखील यावेळी राहुल गांधी यांनी दिले आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत काँग्रेस कोणतीही तडजोड करणार नाही असेदेखील आश्वासन दिले.