हैदराबाद: तेलंगणा राज्य बाल अधिकार सुरक्षा आयोग (टीएससीपीसीआर)ने स्पष्ट केले की, मागील तीन महिन्यांत राज्यात 204 बालविवाह झाले आहेत. “टीएससीपीसीआर’ने सर्व जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी यांना आदेश दिला आहे की, बालविवाह अधिनियम 2006 नुसार लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात यावी.
आयोगानुसार 24 मार्च ते 31 मे दरम्यान राज्यात 204 बालविवाह पार पडले. यावर कडक कारवाई करण्याचे आदेश आयोगाने जिल्हाधिकारी आणि दंडधिकारी यांना दिले आहे. याबाबत आयोगाने चिंता व्यक्त केली असून बालविवाहावर गांभीर्याने विचार केला जात असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
बालविवाह अल्पवयीन मुलींसाठी शारीरिक, आरोग्य आणि शिक्षणातही अडसर ठरतो. बालविवाहामुळे अल्पवयीन मुलींचे जीवन उद्ध्वस्त होत असल्यामुळे बालविवाह कायद्याची कडक अमंलबजावणी होण्यासाठी आयोगाने जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी यांना आदेश दिला आहे.