Assam: आसाममध्ये घुसखोरी करताना पुन्हा 14 बांगलादेशींना पकडले; मुख्यमंत्री सरमा म्हणाले – 9 जणांकडे सापडले भारतीय आधारकार्ड

दिसपूर – आसाममध्ये घुसखोरी करताना 14 बांगलादेशी पकडले गेले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, दक्षिण सलमारा-मानकाचार आणि करीमगंज जिल्ह्यात 14 बांगलादेशी पकडले गेले. यापैकी नऊ जणांकडे भारतीय आधारकार्ड असल्याचे आढळून आले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, जेव्हापासून बांगलादेशातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. सीमेवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. या कालावधीत 108 घुसखोर पकडण्यात आले आहेत. आसाममधील करीमगंज, कचार, धुबरी आणि दक्षिण सलमारा-मानकाचर जिल्हे बांगलादेशला 267.5 किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा सामायिक करतात.
Based on intel input, 14 illegal Bangladeshi nationals were apprehended by @assampolice yesterday in South Salmara and Karimganj
9 of them were found carrying Indian Aadhaar cards.
The apprehended individuals are:
🇧🇩Md. Ariful Islam
🇧🇩Md. Monir Hussain
🇧🇩Mofazal Hussain
🇧🇩Md.… pic.twitter.com/bo4MUfVh3n— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) October 2, 2024
करीमगंजमधील सुतारकांडी येथे एकात्मिक चेक पोस्ट आहे. ईशान्येत तीन चेक पोस्ट आहेत. त्यातील इतर दोन मेघालयातील डौकी आणि त्रिपुरातील अखौरा येथे आहेत. आसामचे पोलीस महासंचालक जीपी सिंग यांनी अलीकडेच सांगितले होते की, बांगलादेशातून भारतात येण्याचा प्रयत्न करणाऱ्या गैर-भारतीयांना रोखण्यासाठी राज्य पोलीस आणि बीएसएफ कायद्यानुसार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. संकटग्रस्त बांगलादेशातून सर्व भारतीय पासपोर्ट धारकांना परत येण्याची परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.





